Health: संध्याकाळी ७च्या आधी जेवण करणे असते का हेल्दी, घ्या जाणून

मुंबई: कोणत्याही फिटनेसबाबत(fitness) जागरूक असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल की दिवसाच्या शेवटच्या जेवणाची वेळ कधी असावी तर ती व्यक्ती रात्रीचे जेवण (dinner) लवकर करण्याच्या फायद्यांची मोठी यादी तुमच्यासमोर वाचून दाखवेल. २०२०मध्ये करण्यात आलेल्या अभ्यानुसार रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते आणि ब्लड शुगरचा स्तरही खराब होण्याचा धोका असतो.



रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदे


हेल्थ एक्सपर्टच्या मते रात्रीचे जेवण लवकर केल्याने वजन नियंत्रणात राहते मात्र केवळ जेवणाच्या वेळेच्या आधाराने वजन घटवता येते याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदेही आहेत.


पाचन तंदुरुस्त राहते - जर तुम्ही लवकर जेवत असाल तर तुमच्या जेवणाचे पचन व्यवस्थित होते. अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच शरीर डिटॉक्सही चांगल्या पद्धतीने होईल.


ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहतो - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर केल्याने इन्सुलिनची प्रक्रिया योग्य राहते. रात्रीचे जेवण लवकर केल्याने शरीरात हाय ब्लड शुगरचा धोका कमी होतो. यामुळे ग्लायसेमिक नियंत्रणात मदत होते.


चांगली झोप येते - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर जेवल्याने तुमचे शरीर रात्रीच्या वेळेस आरामाच्या स्थितीत येते यामुळे चांगली झोप येते.


हृदयाचे आरोग्य राहते चांगले - रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. याशिवाय रात्री लवकर जेवण केल्याने चयापचय क्रिया वाढते.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने

होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....

बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण

Sunetra Pawar Live Updates : सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोडी समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे