Health: संध्याकाळी ७च्या आधी जेवण करणे असते का हेल्दी, घ्या जाणून

मुंबई: कोणत्याही फिटनेसबाबत(fitness) जागरूक असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल की दिवसाच्या शेवटच्या जेवणाची वेळ कधी असावी तर ती व्यक्ती रात्रीचे जेवण (dinner) लवकर करण्याच्या फायद्यांची मोठी यादी तुमच्यासमोर वाचून दाखवेल. २०२०मध्ये करण्यात आलेल्या अभ्यानुसार रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते आणि ब्लड शुगरचा स्तरही खराब होण्याचा धोका असतो.



रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदे


हेल्थ एक्सपर्टच्या मते रात्रीचे जेवण लवकर केल्याने वजन नियंत्रणात राहते मात्र केवळ जेवणाच्या वेळेच्या आधाराने वजन घटवता येते याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदेही आहेत.


पाचन तंदुरुस्त राहते - जर तुम्ही लवकर जेवत असाल तर तुमच्या जेवणाचे पचन व्यवस्थित होते. अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच शरीर डिटॉक्सही चांगल्या पद्धतीने होईल.


ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहतो - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर केल्याने इन्सुलिनची प्रक्रिया योग्य राहते. रात्रीचे जेवण लवकर केल्याने शरीरात हाय ब्लड शुगरचा धोका कमी होतो. यामुळे ग्लायसेमिक नियंत्रणात मदत होते.


चांगली झोप येते - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर जेवल्याने तुमचे शरीर रात्रीच्या वेळेस आरामाच्या स्थितीत येते यामुळे चांगली झोप येते.


हृदयाचे आरोग्य राहते चांगले - रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. याशिवाय रात्री लवकर जेवण केल्याने चयापचय क्रिया वाढते.

Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा