Bharti Singh: लाखांवरून हजारांमध्ये पोहोचली भारती सिंहची कमाई, काय आहे कारण?

Share

मुंबई: लोकांना पोटधरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंहने (bharti singh) नुकतीच आपली फी घटल्याबद्दलचा खुलासा केला आहे. कॉमेडियनने सांगितले की आधीच्या तुलनेत तिच्या फीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कमी फी मिळण्याबाबतचे कारण सांगितले.

कोरोनाने झाला परिणाम

भारतीय सिंहने नुकतीच फीमध्ये झालेल्या कपातीबाबद हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. भारतीने सांगितले, कोरोना काळात शोच्या बजेटवर खूप परिणाम झाला. असे प्रत्येक इंडस्ट्री आणि बिझनेसमध्ये झाले. मात्र कोणालाही हे वाटणार नाही की त्याच्या टॅलेंटला कमी फी मिळावी. आधी मी एका शोसाठी जितकी रक्कम घेत होती त्यापैकी २५ टक्केही रक्कम आता मला मिळत नाही.

अर्ध्या फीमध्ये काम नाही करणार

यासोबतच भारती म्हणाली, जर कोणी मला अर्धी रक्कम देत असेल तर मी काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्या शोसाठी महिन्याचे २६ दिवस काम करायचे म्हणाल आणि रक्कम चांगली देत नसाल तर मी काम करणार नाही. मी माझ्या बाळाला १२-१२ तास एकट्याला सोडून येते. यासाठी मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा.

लाखोंवरून हजारोंवर आली कमाई

यासोबतच भारतीने म्हटले की मी असे नाही म्हणणार की मला आधी लाखो रूपये फी मिळत होती आणि मी आता ५० हजार घेत आहे. जेव्हा मी स्टेजवर येते तेव्हा मला लक्षातही नसते की मला या शोसाठी किती रूपये फी मिळते.

भारती सिंह अनेक रिअॅलिटी शो ऐवजी द कपिल शर्मा शोमध्येही दिसली आहे. या शोजव्यतिरिक्त ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

23 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

43 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago