Asia cup:आशिया चषकावर कोरोनाचे संकट, दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  128

नवी दिल्ली : पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंकेच्या (srilanka) धरतीवर येत्या ३० ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होत आहे. मात्र आशिया चषकावर आता कोरोनाचे संकट घोंघावू लागले आहेत. आशिया चषकाच्या सुरूवातीआधीच यजमान श्रीलंकेचा संघाला कोरोना व्हायरसची (corona virus) लागण झाली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. श्रीलंकेचा खेळाडू अविष्का फर्नांडो आणि विकेटकीपर कुसला परेरा यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


श्रीलंकेच्यया संघाला आधीच मोठा झटका बसला आहे. श्रीलंकेचा स्टार ऑलराऊंडर हसरंगा आशिया चषकातून बाहेर जाणे हे निश्चित झाले आहे. नुकत्याच खेळवण्यात आलेल्या लंका प्रीमियर लीगदरम्यान हसरंगा दुखापतग्रस्त झाला होता. दरम्यान, दुखापतीव्यतिरिक्त हसरंगाने खेळणे सुरू ठेवले आणि कमालीचे प्रदर्शन केले.


हसरंगा या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याशिवाय सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मात्र हसरंगाची दुखापत आता गंभीर झाली आहे. पुढील एक ते दोन दिवसांत तो स्पर्धेबाहेर गेल्याची माहिती मिळू शकते. श्रीलंकेला हे यजमानपद शेवटच्या क्षणी मिळाले आहे. या वर्षी आशिया चषकाच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानजवळ होता. मात्र भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात संघ पाठवण्यात नकार दिला.


यानंतर या यजमानपदावरून वाद सुरू होता. त्यानंतर पाकिस्तानसोबत श्रीलंकेलाही यजमानपदाचे अधिकारही देण्यात आले. स्पर्धेतील पाच सामने पाकिस्तानात खेळवले जाणार. तर बाकी सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानात एकही सामना खेळणार नाही. फायनलचा सामनाही श्रीलंकेत खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार