जेथे संत, तेथे आनंद व समाधान…

Share
  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संताचे दोष दिसणे, म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो; सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहेत, तिथे आनंद आणि समाधान असते, पण तो सामान्य माणसांसारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदान्त आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात, तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्या पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे.

संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. ‘मी करतो’ हे बंधनाला कारण असते; ते नाहीसे करणे म्हणजे ‘गुरूचे होणे’ समजावे. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो, तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रियदमन हे सर्वस्व मानू नये; ते ज्याच्याकरिता आहे, त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे, त्याने काही काळ मुळीच काही करू नये; आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो, तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते.

जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात, त्याचे आपण थोडेतरी आचरण करू या. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही. जिथे माया, अभिमान आहे, तिथे भगवंत नाही.

दानाचेही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला, तर तो बुडवील; त्याचे यथायोग्य दान केले, तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो, तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील? संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले, म्हणजेच देवस्वरूप बनले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago