Teacher recruitment : डी. एड. बेरोजगारांना न्याय मिळवून देणार!

शिक्षक भरतीसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शब्द


कणकवली : यंदा होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये (Teacher recruitment) स्थानिक डी. एड. बेरोजगारांना २०१० प्रमाणे पुन्हा डावलण्यात येईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असणार आहे. गेली १० वर्षे भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी न मिळाल्यास त्यांची वयोमर्यादा संपणार आहे. त्यामुळे पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक डी. एड. बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेऊन करण्यात आली.


स्थानिक डी. एड. बेरोजगारांनी २७ मार्चपासून केलेल्या १४ दिवसांच्या उपोषणाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन न्याय मिळवून देणार, म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाले नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील आश्वासनाचा पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री नारायण राणे यांची कणकवली येथे नुकतीच भेट घेतली.


जिल्ह्यातील डी. एड. बेरोजगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व सचिवांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द मंत्री नारायण राणे यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर