chess world cup: प्रज्ञानंदला जेतेपदाची हुलकावणी

बुद्धिबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेमध्ये कार्लसनची विजेतेपदावर मोहोर


गेले दोन दिवस दोन्ही गेममध्ये बरोबरी झाल्याने निर्णयाला हुलकावणी देणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल गुरुवारी टायब्रेकरमध्ये लागला आणि प्रज्ञानंदच्या जेतेपदाचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने भारताच्या युवा प्रज्ञानंदचा टायब्रेकरच्या सामन्यात १.५-०.५ असा पराभव करत जेतेपदाचा चषक उंचावला.


टायब्रेकरचा पहिला रॅपिड गेम नॉर्वेच्या कार्लसनने ४७ चालींनंतर जिंकला. दुसरा गेम ड्रॉ झाला. त्यामुळे कार्लसनने विजेतेपद पटकावले. यापूर्वी मंगळवारी आणि बुधवारी झालेले दोन्ही गेम ड्रॉ झाले. प्रज्ञानंदने कार्लसनला जेतेपदासाठी चांगलेच झुंजवले.


प्रज्ञानंदने जर अंतिम सामना जिंकला असता, तर तब्बल २१ वर्षांनी भारताच्या शिरपेचात जेतेपदाचा तुरा खोवला असता. याआधी विश्वनाथ आनंदने २००२मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षे कोणत्याही भारतीय खेळाडूला जेतेपदावर मोहोर उमटवता आली नव्हती. प्रज्ञानंद ही कोंडी फोडणार अशी अपेक्षा होती. परंतु गुरुवारी टायब्रेकरमध्ये झालेल्या पराभवामुळे विजेतेपद पटकावण्याची भारताची संधी हुकली.


अंतिम सामन्यातील टायब्रेकरमधील पहिला रॅपिड गेममध्ये कार्लसनने काळ्या रंगातील प्याद्यांसह खेळायला सुरुवात केली. कार्लसनने ४७ चालींमध्ये हा गेम जिंकला. त्याने पहिल्या गेमनंतर टायब्रेकरमध्ये १-० असी आघाडी घेतली. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रज्ञानंदला दुसरा गेम जिंकणे अनिवार्य होते. त्यामुळे त्याच्यावर दुसरा गेम जिंकण्याचा दबाव होता. मात्र हा गेम २२ चालींनंतर अनिर्णित घोषित करण्यात आला.


अंतिम फेरीत मंगळवारी झालेल्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानंदने काळ्या प्याद्यांसह खेळाला सुरुवात केली. हा गेम बरोबरीत सुटला. ३५ चालींनंतर हा सामना ड्रॉ घोषिक करण्यात आला. पहिल्या गेम बरोबरीत सुटल्यानंतर बुधवारी दुसऱ्या गेममध्ये प्याद्यांच्या रंगांची अदलाबदल झाली. यावेळी कार्लसन पांढऱ्या आणि प्रज्ञानंद काळ्या प्याद्यांसह मैदानात उतरले. हा गेम ९० मिनिटे चालला आणि ३० चालींनंतर अनिर्णित घोषित करण्यात आला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व