Maharashtra Rain: राज्यात पावसाची दडी, कधी वाढणार जोर? हवामान विभागाची माहिती

मुंबई: देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (rain) कोसळत आहे. खासकरून उत्तर भारतात (north india) पावसाची तीव्रता वाढली आहे. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना राज्यात मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. राज्याच्या विविध भागांतून पाऊस गायबच झालाय. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


भारताच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पुढील काही दिवसांतही राज्यात पावसाचा जोर वाढणार नाही. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस कोणत्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई, पुणेसह कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रच्या काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे.


गेल्या आठवड्यात हवामान विभागाने दोन आठवड्याच्या अंतराने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. आयएमडीने म्हटले की उत्तर पूर्व बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता होती. मात्र यामुळे पावसाचा जोर वाढण्यास मदत झाली नाही. दरम्यान, राज्यभरात पावसाचे ढग पाहायला मिळाले आणि हलका पाऊसही झाला.


राज्यात ऑगस्ट महिना कोरडाच राहिला. दरम्यान, ५८ टक्के पावसाचे प्रमाण घटले. राज्यात सामान्यपणे २०७.१ मिमीच्या तुलनेत या महिन्यात केवळ ८६.४ मिमी पाऊस झाला. तर ऑगस्टच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सामान्यपणे २०९.८ मिमीच्या तुलनेत ६५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली.


जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. याच मुळे मान्सूनच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात केवळ ७ टक्के पावसाची कमतरता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सामान्य ७४१.१० मिमीच्या तुलनेत ६९२.७० मिमी पाऊश झाला आहे. मात्र जुलैनंतर पावसाला ब्रेक लागला. यामुळे याचा परिणाम पाणी साठ्यावर पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे