Maharashtra Rain: राज्यात पावसाची दडी, कधी वाढणार जोर? हवामान विभागाची माहिती

  222

मुंबई: देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (rain) कोसळत आहे. खासकरून उत्तर भारतात (north india) पावसाची तीव्रता वाढली आहे. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना राज्यात मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. राज्याच्या विविध भागांतून पाऊस गायबच झालाय. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


भारताच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पुढील काही दिवसांतही राज्यात पावसाचा जोर वाढणार नाही. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस कोणत्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई, पुणेसह कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रच्या काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे.


गेल्या आठवड्यात हवामान विभागाने दोन आठवड्याच्या अंतराने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. आयएमडीने म्हटले की उत्तर पूर्व बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता होती. मात्र यामुळे पावसाचा जोर वाढण्यास मदत झाली नाही. दरम्यान, राज्यभरात पावसाचे ढग पाहायला मिळाले आणि हलका पाऊसही झाला.


राज्यात ऑगस्ट महिना कोरडाच राहिला. दरम्यान, ५८ टक्के पावसाचे प्रमाण घटले. राज्यात सामान्यपणे २०७.१ मिमीच्या तुलनेत या महिन्यात केवळ ८६.४ मिमी पाऊस झाला. तर ऑगस्टच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सामान्यपणे २०९.८ मिमीच्या तुलनेत ६५ टक्क्यांची घट पाहायला मिळाली.


जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. याच मुळे मान्सूनच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात केवळ ७ टक्के पावसाची कमतरता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सामान्य ७४१.१० मिमीच्या तुलनेत ६९२.७० मिमी पाऊश झाला आहे. मात्र जुलैनंतर पावसाला ब्रेक लागला. यामुळे याचा परिणाम पाणी साठ्यावर पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक