ISRO: चंद्रानंतर आता इस्रो करणार सूर्यावर स्वारी

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (moon south pole) भारताच्या यानाने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर आता शास्त्रज्ञ सूर्याच्या (sun mission) दिशेने आपली पावले टाकत आहेत. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.


इस्रोने हे यश साजरे करत असतानाच सूर्यावर आता यान पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. सूर्यावर संशोधन करण्यासाठी आपल्या आदित्य एल१ला सूर्याच्या दिशेने रवाना करणार आहे.



४ महिन्यात १५ लाख किमीचा टप्पा


इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, सूर्य मिशनसाठी आदित्य एल १ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. हे मिशन १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांत १५ लाख किमीचे अंतर पार करून सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करून आकडे एकत्रित करून पृथ्वीवर पाठवणार.



या ठिकाणाहून लाँच होणार


आदित्य एल १चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. तेथे सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळावर आधारित भारतीय वेधशाळा तयार केली जात आहे.



सूर्यदेवाच्या नावाने मिशन


आदित्य एल१ हे नाव सूर्यदेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय रॉकेट पीएसएलव्ही द्वारे सोडले जाईल. सूर्य मोहिमेनंतर गगनयान मिशन पुढे जाईल. हे मिशन भारताच्या मनुष्य अंतराळ मिशनचा भाग आहे.



शुक्र ग्रहही आहे यादीत


इस्रोच्या यादीत शुक्र ग्रहाचाही समावेश आहे. लवकरच इस्त्रो शुक्र ग्रहावरही अभ्ासासाठी यान पाठवणार आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन