ISRO: चंद्रानंतर आता इस्रो करणार सूर्यावर स्वारी

  208

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (moon south pole) भारताच्या यानाने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर आता शास्त्रज्ञ सूर्याच्या (sun mission) दिशेने आपली पावले टाकत आहेत. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.


इस्रोने हे यश साजरे करत असतानाच सूर्यावर आता यान पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. सूर्यावर संशोधन करण्यासाठी आपल्या आदित्य एल१ला सूर्याच्या दिशेने रवाना करणार आहे.



४ महिन्यात १५ लाख किमीचा टप्पा


इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, सूर्य मिशनसाठी आदित्य एल १ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. हे मिशन १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांत १५ लाख किमीचे अंतर पार करून सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करून आकडे एकत्रित करून पृथ्वीवर पाठवणार.



या ठिकाणाहून लाँच होणार


आदित्य एल १चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. तेथे सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळावर आधारित भारतीय वेधशाळा तयार केली जात आहे.



सूर्यदेवाच्या नावाने मिशन


आदित्य एल१ हे नाव सूर्यदेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय रॉकेट पीएसएलव्ही द्वारे सोडले जाईल. सूर्य मोहिमेनंतर गगनयान मिशन पुढे जाईल. हे मिशन भारताच्या मनुष्य अंतराळ मिशनचा भाग आहे.



शुक्र ग्रहही आहे यादीत


इस्रोच्या यादीत शुक्र ग्रहाचाही समावेश आहे. लवकरच इस्त्रो शुक्र ग्रहावरही अभ्ासासाठी यान पाठवणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )