Ajit Pawar's NCP : फोटो वापरायला शरद पवारांनी नकार दिला असला तरीही अजितदादांच्या गटाला मिळतंय आणखी बळ...

  151

सातार्‍यातही जयंत पाटलांच्या समर्थकांची अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती


बीड : डॉ. योगेश क्षीरसागर (Dr. Yogesh Kshirsagar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar's NCP) गटात बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला. क्षीरसागर यांच्या कार्यक्रमावेळी फ्लेक्सवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो नसल्यानं माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना मिळाल्याचं समोर येत आहे. बीडमधील सभेच्या टिझरमध्ये देखील शरद पवारांचा फोटो वापरणं टाळण्यात आलं होतं.


अजित पवार गटाने बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं कारण म्हणजे 'फोटो वापराल तर कोर्टात खेचेन' असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. असं असलं तरी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.


अजित पवार यांनी योगेश क्षीरसागरांच्या पक्षप्रवेशावेळी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडसाठी नवे संकेतही दिले. मी आणि माझ्या समर्थकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला, असं क्षीरसागर यावेळी म्हणाले. शिवाय अजित पवार यांनी काल सातारा येथे बोलावलेल्या बैठकीलाही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत जाणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. तासगावातून प्रताप पाटील यांच्यासह तासगाव तालुक्यातील काही नेते आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे.