Disqualification of 16 MLAs : आमदार अपात्रतेच्या निर्णयावर शिंदे गटाचे ६,००० पानांचे उत्तर!

निकाल लागणार कधी?


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला साथ दिल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाले असून या घटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून पुनरावृत्तीही झाली. मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत बंड केलेल्या १६ आमदारांविरुद्ध ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लावला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या निकालाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही अजून निकाल लागलेला नाही. त्यातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूकही लागणार आहे, त्यामुळे हा निकाल कधी लावणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.


या संदर्भात निकाल लावण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे सांगत होते, परंतु, दोन महिन्यांनंतरही उत्तर न मिळाल्याने ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही गटांकडून उत्तर मागविले होते. ठाकरे गटाने २६२ पानी उत्तर १८ जुलैला दिलं होतं. तर शिंदे गटाने वेळ वाढवून मागितली होती.


यानंतर आता शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर सुनावणीला कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि योग्य प्रकारे निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. त्यामुळे हा निकाल नक्की कधी व कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात