Disqualification of 16 MLAs : आमदार अपात्रतेच्या निर्णयावर शिंदे गटाचे ६,००० पानांचे उत्तर!

निकाल लागणार कधी?


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला साथ दिल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाले असून या घटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून पुनरावृत्तीही झाली. मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत बंड केलेल्या १६ आमदारांविरुद्ध ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लावला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या निकालाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही अजून निकाल लागलेला नाही. त्यातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूकही लागणार आहे, त्यामुळे हा निकाल कधी लावणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.


या संदर्भात निकाल लावण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे सांगत होते, परंतु, दोन महिन्यांनंतरही उत्तर न मिळाल्याने ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही गटांकडून उत्तर मागविले होते. ठाकरे गटाने २६२ पानी उत्तर १८ जुलैला दिलं होतं. तर शिंदे गटाने वेळ वाढवून मागितली होती.


यानंतर आता शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर सुनावणीला कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि योग्य प्रकारे निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. त्यामुळे हा निकाल नक्की कधी व कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली