IND vs IRE: तिसऱ्या टी-२०मध्ये बुमराह या खेळाडूंना देणार संधी?

डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घगेतली आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या राखीव खेळाडूंना संधी देत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.



भारत आणि आयर्लंड यांच्यात तिसरा सामना


कर्णधार जसप्रीत बुमराहला या सामन्यात गोलंदाजी आणि आपल्या वर्कलोड तसेच संघाच्या बेंच स्ट्रेंथसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे. बुमराहने पहिल्या दोन सामन्यात आठ ओव्हर टाकल्या. बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जितकी जास्त गोलंदाजी करतील तितका त्यांचा फिटनेस वाढेल आणि ते आशिया कपमध्ये पाकिस्तानसारख्या संघाचा सामना करण्यासाठी चांगल्या फॉर्ममध्य असतील.



बुमराह उघडू शकतो या क्रिकेटर्सचे नशीब


भारताला आशिया कपमध्ये खेळायचे आहे आणि अशातच या दौऱ्यावरील राखीव खेळाडूंकडे लक्ष द्यावेच लागेल. भारताने आधीच या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात आवेश खान, जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.



या खेळाडूंना मिळणार टी-२० पदार्पणाची संधी


भारतीय संघ मॅनेजमेंट जर संजू सॅमसनला विश्रांती देऊन जितेश शर्माला संधी देत असेल तर फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होईल. सॅमसन संघातील वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याला नक्कीच बाहेर बसायचे नसेल. कारण वर्ल्डकपसाठी त्याचे स्थान निश्चित झालेले नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला सातत्याने संधी मिळत राहिल मात्र त्याच्या कामगिरी सातत्य नाही. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात आवेश खान अथवा मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.



या प्लेईंग ११सोबत उतरू शकते टीम इंडिया


ऋतुराज गायकवाड़ (उपकप्तान) यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे , रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात