IND vs IRE: तिसऱ्या टी-२०मध्ये बुमराह या खेळाडूंना देणार संधी?

डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घगेतली आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या राखीव खेळाडूंना संधी देत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.



भारत आणि आयर्लंड यांच्यात तिसरा सामना


कर्णधार जसप्रीत बुमराहला या सामन्यात गोलंदाजी आणि आपल्या वर्कलोड तसेच संघाच्या बेंच स्ट्रेंथसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे. बुमराहने पहिल्या दोन सामन्यात आठ ओव्हर टाकल्या. बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जितकी जास्त गोलंदाजी करतील तितका त्यांचा फिटनेस वाढेल आणि ते आशिया कपमध्ये पाकिस्तानसारख्या संघाचा सामना करण्यासाठी चांगल्या फॉर्ममध्य असतील.



बुमराह उघडू शकतो या क्रिकेटर्सचे नशीब


भारताला आशिया कपमध्ये खेळायचे आहे आणि अशातच या दौऱ्यावरील राखीव खेळाडूंकडे लक्ष द्यावेच लागेल. भारताने आधीच या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात आवेश खान, जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.



या खेळाडूंना मिळणार टी-२० पदार्पणाची संधी


भारतीय संघ मॅनेजमेंट जर संजू सॅमसनला विश्रांती देऊन जितेश शर्माला संधी देत असेल तर फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होईल. सॅमसन संघातील वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याला नक्कीच बाहेर बसायचे नसेल. कारण वर्ल्डकपसाठी त्याचे स्थान निश्चित झालेले नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला सातत्याने संधी मिळत राहिल मात्र त्याच्या कामगिरी सातत्य नाही. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात आवेश खान अथवा मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.



या प्लेईंग ११सोबत उतरू शकते टीम इंडिया


ऋतुराज गायकवाड़ (उपकप्तान) यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे , रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे