Fraud : मुंबईतील 'या' कंपनीने लावला दोन बँकांना ३८८ कोटींचा चूना; फसवणूक प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

  316

मुंबई : सीबीआयने मुंबईमधील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Varun Industries Ltd) संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ३८८.१७ कोटी रुपयांची फसवणूक (fraud) केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक असून आरोपींनी बँकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पहिल्या प्रकरणात २६९ कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात ११८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण ३८८.१७ कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.


सीबीआयने (CBI) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन कंपन्या एक वरुण ज्वेल आणि दुसरी ट्रायमॅक्स डेटा सेंटरची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली होती. बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती. वरुण ज्वेलने पीएनबीकडून कर्ज घेऊन त्यांच्या खात्यात ४६ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचे खाते एनपीए झाले आहे.


कंपनीचं खाते एनपीए झाल्यानंतर पीएनबीला ६३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने पीएनबीकडून कर्ज घेऊन ८ कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.


तर वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसने २०१४ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून २९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते.


त्यानंतर कंपनीनं इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. अशा परिस्थितीत २०१८ मध्ये त्याचे खाते एनपीए झाले. ट्रायमॅक्स आयटीने १९० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून निधीचा गैरवापर केला आणि त्यांचे खाते २०१७ मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.