शालेय पोषण आहारात तिस-यांदा आढळल्या अळ्या!

गैरप्रकार उघडकीस येऊ नये म्हणून ‘या’ शाळेत विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघड


अहमदनगर : नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शालेय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी पालकांनी आज शाळेत आंदोलन केले आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


सोनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना १९ ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार वाटप केला. त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. अळ्या आढळल्याची ही तिसरी वेळ आहे.


घडलेली घटना शाळेबाहेर जाऊ नये म्हणून शिक्षकांनी मुलांच्या हातून आहार हिसकाऊन त्याची विल्हेवाट लावली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या आरोग्याशी खेळणं ही खूप निंदनीय बाब आहे आणि ही घटना खरी आहे. याची शहानिशा कार्यकर्त्यांनी केली आहे व त्याचे पुरावे देखील आहेत.


दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच ज्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. स्वराज्य संघटना या गावकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा स्वराज्य संघटना या बाबतीत आक्रमक भूमिका घेईल, असे निवेदन देखील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक