पालघर : भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.
पाच दिवसांपूर्वी पालघरमधील कार चालक आसिफ शेख याची अर्टिका कार भाड्यावर घेऊन तीन आरोपी नाशिककडे निघाले होते. मात्र कार चोरण्याच्या उद्देशाने रस्त्यातच या आरोपींनी कार चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह आंबोली घाटात फेकला.
यानंतर कारचे मालक आणि मृत कार चालकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांनी कसुन शोध घेत पहिल्या आरोपीला ओडिसातून तर दुसऱ्या आरोपीला नागपूर येथून चालत्या ट्रेन मधून अटक केली.
या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु असून अर्टिका कार देखील ताब्यात घेतली आहे. कार चालकाची झालेली हत्या ही कार चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…