Crime news : चारित्र्यावर संशय घेत १७ वर्षीय मुलाने केली आईची हत्या

वसई : वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य सुनिता सुनिल घोघरा (वय ३६) या महिलेची तिच्याच १७ वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.


ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (२० ऑगस्ट) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती.


सुनिता ही वालीव परिसरात नोकरीला जात असे. रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन सुनिता आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारासाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली.


पोलिसांनी सुरुवातीला तिच्या पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर मुलाची चौकशी केली असता आपणच आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचे मुलाने कबूल केले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४