Crime news : चारित्र्यावर संशय घेत १७ वर्षीय मुलाने केली आईची हत्या

  437

वसई : वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य सुनिता सुनिल घोघरा (वय ३६) या महिलेची तिच्याच १७ वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.


ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (२० ऑगस्ट) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती.


सुनिता ही वालीव परिसरात नोकरीला जात असे. रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन सुनिता आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारासाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली.


पोलिसांनी सुरुवातीला तिच्या पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर मुलाची चौकशी केली असता आपणच आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचे मुलाने कबूल केले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी