IND vs IRE : ही मोठी डोकेदुखी आहे, विजयानंतरही असं का म्हणाला बुमराह

  183

डबलिन: आयर्लंड (ireland) आणि भारत (india) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने (team india) अतिशय सहजपणे ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये आधी फलंदाजांनी तर नंतर गोलंदाजांनी कमाल केली.


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या. यानंतर आयर्लंडच्या डावाला १५२ धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाने या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही मोठे विधान केले आहे.



ही सगळ्यात मोठी डोकेदुखी


आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्यासाठी कोणती गोष्ट सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे याचा खुलासा केला. त्याने सांगितले सगळ्यात कठीण आहे अंतिम ११ची निवड करणे.


विजयानंतर बुमराह म्हणाला, मला चांगले वाटत आहे. हे खूपच शानदार आहे. मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ची निवड करणे. सगळेच उत्सुक आहेत. सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड आङे. आम्हाला सगळ्यांनाच भारतासाठी खेळायचे आहे. अखेर सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने काम करावे लागेल. जर तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून खेळता तर तुम्ही दबावात आहात. तुम्हाला त्या अपेक्षा एका बाजूला ठेवाव्या लागतील. जर तुम्ही इतक्या अपेक्षांसोबत खेळत आहात तर तुम्ही १०० टक्के स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.



दुसऱ्या टी-२०मध्ये बुमराहची जादू


पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत बुमराहने शानदार कमबॅक केले. दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. बुमराहने चार ओव्हरमध्ये १५ धावा देत २ विकेट मिळवल्या. बुमराह सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला