लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात, ९ जवान शहीद

लेह: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला दुर्देवी अपघात झाला. लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघतात ९ जवान शहीद झालेत. तर यात एक जवान जखमी झाला आहे. लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला. ही दुर्घटना दक्षिण लडाखच्या न्योमामधल केरे येथे झाले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य करण्यात आले.



संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी व्यक्त केला शोक


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि ट्वीट करत लडाखच्या लेह येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद जवानांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. देशासाठी त्यांनी केलेली सेवा नेहमीच लक्षात राहील. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती कायम आहे. जखमी जवानांना फिल्ड रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते ही लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो.






कारू गॅरीसनवरून क्यारीच्या दिशेने जात होते जवान


मीडिया रिपोर्ट्सनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमार कियारी येथन ७ किमी आधी दरीत वाहन कोसळले. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचे हे वाहन कारू गॅरीसन येथून लेह जवळील क्यारी येथे जात होते. या वाहनात एकूण १० जवान प्रवास करत होते.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात