लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात, ९ जवान शहीद

लेह: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला दुर्देवी अपघात झाला. लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघतात ९ जवान शहीद झालेत. तर यात एक जवान जखमी झाला आहे. लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला. ही दुर्घटना दक्षिण लडाखच्या न्योमामधल केरे येथे झाले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य करण्यात आले.



संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी व्यक्त केला शोक


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि ट्वीट करत लडाखच्या लेह येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद जवानांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. देशासाठी त्यांनी केलेली सेवा नेहमीच लक्षात राहील. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती कायम आहे. जखमी जवानांना फिल्ड रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते ही लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो.






कारू गॅरीसनवरून क्यारीच्या दिशेने जात होते जवान


मीडिया रिपोर्ट्सनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमार कियारी येथन ७ किमी आधी दरीत वाहन कोसळले. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचे हे वाहन कारू गॅरीसन येथून लेह जवळील क्यारी येथे जात होते. या वाहनात एकूण १० जवान प्रवास करत होते.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे