Nashik Crime : नाशिकच्या चोरट्यांची हिंमत वाढली; थेट केंद्रीय मंत्र्याच्या आईचे मंगळसूत्र चोरले!

काय घडलं नेमकं?


नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी वाढीस लागली असून नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली. यावेळी परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे कोणाला आवाज देता आला नाही असे शांताबाई बागुल यांनी सांगितलं.



भारती पवार यांच्या मातोश्री काय म्हणाल्या?


नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल भारती पवार यांच्या मातोश्रींनी स्वतः माहिती दिली. त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. पोत हिसकावून घेतली. पोत गेल्याचं मला कळलं. ते हळूहळू निघून गेले. पण त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळले आणि बघत होते मी काही ओरडते का ते. पण मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते, अशी माहिती भारती पवार यांच्या आईंनी दिली.



नाशिकमधील गुन्हेगारी चिंताजनक


नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील