भारताची मालिकेत विजयी आघाडी, दुसऱ्या टी-२०मध्ये आयर्लंडविरुद्ध ३३ धावांनी विजय

डबलिन : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ३३ धावांनी बाजी मारली. य़ा विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या होत्या.


भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५८ धावांची जबरदस्त खेळी केली. तर संजू सॅमसनने ४० धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही ३८ धावा केल्या. तर शिवम दुबेने २२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या चारही खेळाडूंच्या धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या. आयर्लंडला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान मिळाले.


दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी झाली. यशस्वी जयसवालने ११ बॉलमध्ये १८ धावा केल्या. तिलक वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. त्याला केवळ एक धाव करता आली. यानंतर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसनने २६ बॉलमध्ये ४० धावांची खेळई केली. यातच ऋतुराजने ३९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.


दरम्यान, अर्धशतकानंतर तो ५८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शिवम आण रिंकू सिंह संघर्ष करत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली. रिंकू सिंह २१ बॉलमध्ये ३८ धावा करून बाद झाला. शिवम १६ बॉलमध्ये २२ धावा करत नाबाद राहिला.


दुसरीकडे, आयर्लंडने भारताला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. मात्र आयर्लंडला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. आयर्लंडकडून सलामीवीर अँडी बालबिर्नीने जबरदस्त ७२ धावांची खेळी केली. तर मार्क अडायरने २३ धावांची खेळी केली. बाकी इतर कोणाला चांगली खेळी करता आली नाही.


Comments
Add Comment

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड