टोमॅटोनंतर कांद्याचे दर वाढण्याची भीती, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Share

मुंबई: दराची शंभरी पार केलेले टोमॅटो(tomato) आता कुठे कमी होत आहेत. टोमॅटोचे दर बाजारात कमी झाले आहेत. यातच कांद्याच्या दरांनीही(onion rate) सर्वसामन्यांना रडवू नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टोमॅटोप्रमाणे कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी सरकार आधीपासूनच पावले उचलत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. म्हणजेच कांदा परदेशात विकायचा असेल तर विक्रेत्याला ४० टक्के शुल्क सरकारला द्यावे लागेल.

निर्यात शुल्क ४० टक्के

सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असेल.

 

खरंतर, गेल्या आठवड्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये नवे पीक येईपर्यंत किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून कांदा बाजारात उतरवण्याची घोषणा केली होती. सरकार कांदा वितरणासाठी विविध पर्याय शोधत आहे. यात ई लिलाव, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहक सहकारी समिती तसेच नगरपालिकांकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून सूट देण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांशी करार या मार्गाचा वापर केला जात आहे.

कांद्याच्या किंमतीत वाढ सुरू

बाजारात कांद्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. सध्या बाजारात ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा उफलब्ध आहे. किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही दिवसांआधीच बफर स्टॉक बाजारात आणला होता. खराब दर्जाच्या कांद्याचे मोठे प्रमाण, टोमॅटोसह इतर भाज्यांच्या वाढत्या किंमती, पूर तसेच मुसळधा पाऊस ही अनेक कारणे कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत आहेत.

Recent Posts

वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…

34 minutes ago

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

2 hours ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

2 hours ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

3 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

3 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

5 hours ago