टोमॅटोनंतर कांद्याचे दर वाढण्याची भीती, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: दराची शंभरी पार केलेले टोमॅटो(tomato) आता कुठे कमी होत आहेत. टोमॅटोचे दर बाजारात कमी झाले आहेत. यातच कांद्याच्या दरांनीही(onion rate) सर्वसामन्यांना रडवू नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टोमॅटोप्रमाणे कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी सरकार आधीपासूनच पावले उचलत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. म्हणजेच कांदा परदेशात विकायचा असेल तर विक्रेत्याला ४० टक्के शुल्क सरकारला द्यावे लागेल.



निर्यात शुल्क ४० टक्के


सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असेल.


 


खरंतर, गेल्या आठवड्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये नवे पीक येईपर्यंत किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून कांदा बाजारात उतरवण्याची घोषणा केली होती. सरकार कांदा वितरणासाठी विविध पर्याय शोधत आहे. यात ई लिलाव, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहक सहकारी समिती तसेच नगरपालिकांकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून सूट देण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांशी करार या मार्गाचा वापर केला जात आहे.



कांद्याच्या किंमतीत वाढ सुरू


बाजारात कांद्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. सध्या बाजारात ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा उफलब्ध आहे. किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही दिवसांआधीच बफर स्टॉक बाजारात आणला होता. खराब दर्जाच्या कांद्याचे मोठे प्रमाण, टोमॅटोसह इतर भाज्यांच्या वाढत्या किंमती, पूर तसेच मुसळधा पाऊस ही अनेक कारणे कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत आहेत.

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील