Bhashini tool : डिजिटल इंडियाची यशस्वी वाटचाल; भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी AI आधारित ‘भाषिणी’ टूल

  221

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा


नवी दिल्ली : भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेकविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, प्रत्येकालाच प्रत्येक भाषा येते असं नाही. अशावेळी भाषांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय (AI) आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शनिवारी जी २० (G20) डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना ही घोषणा त्यांनी केली आहे.


भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडियाच्या (Digital India) दृष्टीने ही एक यशस्वी वाटचाल आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.



डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. यात डिजिटल अर्थव्‍यवस्था ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल पेमेंट करण्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यावर जमा होतो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच यामुळे ३३ बिलियनहून अधिक पैशांची बचत झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.



जॅम ट्रिनिटीचा अनेकांना फायदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने सुरू केलेली जनधन, आधार आणि मोबाइल (JAM trinity) या संकल्पना देखील अधिक फायदेशीर ठरत आहेत. २०१५ साली आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे आणि या गेल्या नऊ वर्षात भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. यूपीआयद्वारे (UPI) १० अब्ज रुपयांची देवाणघेवाण महिन्याला होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके