Bhashini tool : डिजिटल इंडियाची यशस्वी वाटचाल; भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी AI आधारित ‘भाषिणी’ टूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा


नवी दिल्ली : भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेकविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, प्रत्येकालाच प्रत्येक भाषा येते असं नाही. अशावेळी भाषांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय (AI) आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शनिवारी जी २० (G20) डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना ही घोषणा त्यांनी केली आहे.


भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडियाच्या (Digital India) दृष्टीने ही एक यशस्वी वाटचाल आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.



डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. यात डिजिटल अर्थव्‍यवस्था ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल पेमेंट करण्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यावर जमा होतो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच यामुळे ३३ बिलियनहून अधिक पैशांची बचत झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.



जॅम ट्रिनिटीचा अनेकांना फायदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने सुरू केलेली जनधन, आधार आणि मोबाइल (JAM trinity) या संकल्पना देखील अधिक फायदेशीर ठरत आहेत. २०१५ साली आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे आणि या गेल्या नऊ वर्षात भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. यूपीआयद्वारे (UPI) १० अब्ज रुपयांची देवाणघेवाण महिन्याला होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी