अमेठीतून राहुल गांधी, तर प्रियंका वाराणसीतून मोदींविरोधात लढणार, यूपी काँग्रेस अध्यक्षांची माहिती

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी २०१४ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लढणार आहेत. ही माहती शुक्रवारी यूपी काँग्रेसचे प्रभारी अजय राय यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी या दरम्यान असेही सांगितले की केरळच्या वायनाडच्या खासदारांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा कोठून निवडणूक लढणार हे ही सांगितले. राय यांच्या मते,प्रियंकांना जर वाटले तर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातूनही वाराणसीतूनही निवडणूक लढवू शकतात.


प्रियंका यांच्यासाठी कार्यकर्ते प्राणपणाने लढू शकतात. मीडियाने अजय राय यांना राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार का याबाबतचा सवाल केला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, नक्कीच. ते अमेठीतून निवडणूक लढवतील. जर प्रियंका गांधी यांची वाराणसीतून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करेल.



स्मृती इराणींवर राय यांचा निशाणा


केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याशी संबंधित प्रश्नावर बोलताना अजय राय यांनी टीकेची झोड उठवली. १३ रूपये प्रति किलोच्या हिशेबाने त्या साखर देणार होत्या? त्यांनी साखर दिली आहे. आमचे लोक अमेठीतून आले आहेत तुम्ही त्यांना विचारा की त्या काय म्हणाल्या होत्या. अशातच जनतेला त्यांनी उत्तर दिले पाहिजे.


 


लोकसभा का महत्त्वाची?


उत्तर प्रदेशातील ८० लोकसभेच्या जागांपैकी एक अमेठी आहे.येथील खासदार इराणी आहेत. त्यांनी २०१९मध्ये निवडणूक जिंकली होती. तर याआधी तीन वेळा २००४, २००९ आणि २०१४मध्ये राहुल या ठिकाणी खासदार राहिले होते. राहुल यांच्या आधी सोनिया यांनी १९९९मध्ये या ठिकाणाहून विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव