IND vs IRE: बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) टी-२० मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया (team india) आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारत(india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात भारताचे नेतृत्व टीम इंडियाचा युवा खेळाडू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) करत आहे. बुमराहने तब्बल वर्षभरानंतर मैदानावर पुनरागमन केले आहे.



बुमराहने रचला इतिहास


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात उतरताच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. तो टी-२०चा पहिला गोलंदाज कर्णधार आहे. आतापर्यंत टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व फलंदाजांनी केले आहे.



केवळ तीन खेळाडूंनी केले ५०हून अधिक सामन्यात नेतृत्व


जसप्रीत बुमराह हा टी-२०चा ११वा कर्णधार आहे. याआधी टी-२० संघाचे नेतृत्व कऱणाऱ्या कर्णधारांच्या यादीवर नजर टाकली असता केवळ तीनच असे खेळाडू आहेत ज्यांनी ५०हून अधिक सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक ७२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.


त्याच्या नेतृत्वात भारताने ४१ सामने जिंकले आहेत तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णीत राहिला. धोनीच्या विजयाची टक्केवारी ६० टक्के आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने ५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने ५० सामन्यांत नेतृत्व केले आहे.



यांनी केलेय भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व


जसप्रीत बुमराहआधी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व १० खेळाडूंनी केले आहे. वीरेंद्र सेहवाग पहिला कर्णधार आहे. यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना,अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नेतृत्व केले आहे.


Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य