IND vs IRE: बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) टी-२० मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया (team india) आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारत(india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात भारताचे नेतृत्व टीम इंडियाचा युवा खेळाडू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) करत आहे. बुमराहने तब्बल वर्षभरानंतर मैदानावर पुनरागमन केले आहे.



बुमराहने रचला इतिहास


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात उतरताच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. तो टी-२०चा पहिला गोलंदाज कर्णधार आहे. आतापर्यंत टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व फलंदाजांनी केले आहे.



केवळ तीन खेळाडूंनी केले ५०हून अधिक सामन्यात नेतृत्व


जसप्रीत बुमराह हा टी-२०चा ११वा कर्णधार आहे. याआधी टी-२० संघाचे नेतृत्व कऱणाऱ्या कर्णधारांच्या यादीवर नजर टाकली असता केवळ तीनच असे खेळाडू आहेत ज्यांनी ५०हून अधिक सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक ७२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.


त्याच्या नेतृत्वात भारताने ४१ सामने जिंकले आहेत तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णीत राहिला. धोनीच्या विजयाची टक्केवारी ६० टक्के आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने ५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने ५० सामन्यांत नेतृत्व केले आहे.



यांनी केलेय भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व


जसप्रीत बुमराहआधी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व १० खेळाडूंनी केले आहे. वीरेंद्र सेहवाग पहिला कर्णधार आहे. यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना,अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नेतृत्व केले आहे.


Comments
Add Comment

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या