IND vs IRE: भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय, मालिकेत १-०ने आघाडी

डबलिन : भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी १४० धावांचे आव्हान मिळाले होते. पावसामुळे खेळ जेव्हा थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने ६.५ ओव्हरमध्ये २ बाद ४७ धावा केल्या होत्या.


त्याआधी आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना कँफर आणि मकार्थी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर १४० धावांचे आव्हान ठेवले होते. दोघांनी ७व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मकार्थीने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.


आयर्लंडचे सुरूवातीचे सहा विकेट पटापट गेले. त्यामुळे शंभरच्या आतच आयर्लंडचा डाव संपतो की काय असे वाटत होते. मात्र मकार्थी आणि कँफर यांनी केलेल्या शानदार भागीदारीमुळे आयर्लंडला १४० धावांचा टप्पा गाठता आला.



बुमराहने रचला इतिहास


बुमराहने आज आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. टी-२०चे नेतृत्व करणारा बुमराह पहिला गोलंदाज कर्णधार ठरला आहे. याआधी टी-२०चे नेतृत्व केवळ फलंदाज कर्णधारांनी केले आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात