डबलिन : भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी १४० धावांचे आव्हान मिळाले होते. पावसामुळे खेळ जेव्हा थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने ६.५ ओव्हरमध्ये २ बाद ४७ धावा केल्या होत्या.
त्याआधी आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना कँफर आणि मकार्थी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर १४० धावांचे आव्हान ठेवले होते. दोघांनी ७व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मकार्थीने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
आयर्लंडचे सुरूवातीचे सहा विकेट पटापट गेले. त्यामुळे शंभरच्या आतच आयर्लंडचा डाव संपतो की काय असे वाटत होते. मात्र मकार्थी आणि कँफर यांनी केलेल्या शानदार भागीदारीमुळे आयर्लंडला १४० धावांचा टप्पा गाठता आला.
बुमराहने आज आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. टी-२०चे नेतृत्व करणारा बुमराह पहिला गोलंदाज कर्णधार ठरला आहे. याआधी टी-२०चे नेतृत्व केवळ फलंदाज कर्णधारांनी केले आहे.
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…