IND vs IRE: भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय, मालिकेत १-०ने आघाडी

  131

डबलिन : भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी १४० धावांचे आव्हान मिळाले होते. पावसामुळे खेळ जेव्हा थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने ६.५ ओव्हरमध्ये २ बाद ४७ धावा केल्या होत्या.


त्याआधी आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना कँफर आणि मकार्थी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर १४० धावांचे आव्हान ठेवले होते. दोघांनी ७व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मकार्थीने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.


आयर्लंडचे सुरूवातीचे सहा विकेट पटापट गेले. त्यामुळे शंभरच्या आतच आयर्लंडचा डाव संपतो की काय असे वाटत होते. मात्र मकार्थी आणि कँफर यांनी केलेल्या शानदार भागीदारीमुळे आयर्लंडला १४० धावांचा टप्पा गाठता आला.



बुमराहने रचला इतिहास


बुमराहने आज आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. टी-२०चे नेतृत्व करणारा बुमराह पहिला गोलंदाज कर्णधार ठरला आहे. याआधी टी-२०चे नेतृत्व केवळ फलंदाज कर्णधारांनी केले आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी