Shasan Aplya dari : अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी, महिला व कलावंतांसाठीही सरकार कटीबद्ध

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजितदादांचे वक्तव्य


शिर्डीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे घेणार दर्शन


शिर्डी : आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. तसंच 'शासन आपल्या दारी' या उपक्रमामुळे झालेला फायदा सांगितला.

अजित पवार म्हणाले, देशामध्ये अनेक राज्य सरकार असतात जे आपापल्या पद्धतीने सरकार चालवतात, राज्यकर्ते मंत्रालयात बसून निर्णयदेखील घेतात. परंतु ज्या योजना सर्वसामान्य, अगदी शेवटच्या माणसाकरता असतात दुर्दैवाने त्या योजनेचा लाभ त्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम सुरु करुन वेगवेगळ्या गटातील लाभार्थ्यांना हुडकून स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचायचे ठरवले.

पुढे ते म्हणाले, आम्ही महिला व वयस्कर कलावंतांनाही लाभ दिला. शेवटी कुठलाही कलावंत असला तरी त्याच्या अंगात कला असतेच, पण प्रत्येकाचा एक काळ असतो. उतारवयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कधीकधी दोन वेळचं अन्नदेखील या कलावंतांना मिळत नाही. त्याहीकरता शासन कटीबद्ध आहे, जागरुक आहे. आज करोडो रुपयांचा खर्च आपण त्यांच्यासाठी करत आहोत. असं अजित पवार म्हणाले.

साईबाबांचे घेणार दर्शन


साईबाबांच्या शिर्डीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणं हा एक उत्तम योगोयोग आहे. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आपण सर्वांनी कायम पाळला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेऊन मग मुंबईला रवाना होणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे