Rain Alert : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार! सुमारे ४०० बळी, १७०० घरे जमीनदोस्त

हिमाचल आणि ओडिशा वगळता अन्य राज्यात मात्र पावसाने घेतली पूर्ण विश्रांती


शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (Rain Alert) सगळीकडे हाहाकार उडाला आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसात ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त ३२७ लोकांचा मृत्यू झाला असून १७०० पेक्षा जास्त घरे नष्ट झाली आहेत.


हिमाचल प्रदेश सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सफरचंद उत्पादकांना एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे सफरचंदांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात दरवर्षी २४ ते २८ किलो वजनाच्या ३ ते ४ कोटी पेट्या सफरचंदाचे उत्पादन होते. यंदा मात्र १ ते ४ कोटी पेट्याच उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.


शेजारील ओडिशा राज्यातही पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला तर ७ लोक जखमी झाले आहेत. बालासोरमध्ये ३ आणि भद्रक जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच मयूरभंज जिल्ह्यातही एका जणाचा मृत्यू झाला.


देशात अन्य राज्यात मात्र पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या राज्यातील पिके संकटात सापडली आहेत.


तज्ज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सर्वाधिक पावसाचे आहेत. या महिन्यात जर पावसाला ब्रेक लागला तर पहाडी भागात ढग गोळा होतात आणि येथेच जोरदार पाऊस पडतो. यामुळेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आणखी ५ ते ७ दिवस मान्सून ब्रेक असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू

India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात

Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि

Presidential Award : ऑपरेशन सिंदूर”सह विविध मोहिमांतील वीरांना सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात