Rain Alert : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार! सुमारे ४०० बळी, १७०० घरे जमीनदोस्त

हिमाचल आणि ओडिशा वगळता अन्य राज्यात मात्र पावसाने घेतली पूर्ण विश्रांती


शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (Rain Alert) सगळीकडे हाहाकार उडाला आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसात ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त ३२७ लोकांचा मृत्यू झाला असून १७०० पेक्षा जास्त घरे नष्ट झाली आहेत.


हिमाचल प्रदेश सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सफरचंद उत्पादकांना एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे सफरचंदांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात दरवर्षी २४ ते २८ किलो वजनाच्या ३ ते ४ कोटी पेट्या सफरचंदाचे उत्पादन होते. यंदा मात्र १ ते ४ कोटी पेट्याच उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.


शेजारील ओडिशा राज्यातही पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला तर ७ लोक जखमी झाले आहेत. बालासोरमध्ये ३ आणि भद्रक जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच मयूरभंज जिल्ह्यातही एका जणाचा मृत्यू झाला.


देशात अन्य राज्यात मात्र पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या राज्यातील पिके संकटात सापडली आहेत.


तज्ज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सर्वाधिक पावसाचे आहेत. या महिन्यात जर पावसाला ब्रेक लागला तर पहाडी भागात ढग गोळा होतात आणि येथेच जोरदार पाऊस पडतो. यामुळेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आणखी ५ ते ७ दिवस मान्सून ब्रेक असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर