मुंबई: दुखापतीमुळे ११ महिन्यांच्या सुट्टीनंतर संघात परतलेला जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडविरुद्ध (ireland) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. उद्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया (team india) मैदानात उतरणार आहे. आशिया कप आधी होणारी ही मालिका म्हणजे खेळाडूंची एक प्रकारची फिटनेस चाचणीच असणार आहे. आशिया कपच्या स्पर्धा या महिन्यातच ३० ऑगस्टला सुरू होत आहेत. त्यानंतर भारतात वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.
बुमराहसह सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा सारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. संजू सॅमसनवरही सर्वांच्या नजरा असतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामन्याबाबत जाणून घ्या सर्व काही…
कधी : १८ ऑगस्ट शुक्रवार
कुठे: द व्हिलेज,डबलिन
वेळ : संध्याकाळी साडेसात वाजता
कुठे पाहू शकता : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-१ एचडी
भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(कर्णधार)
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग(कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, बेरी मॅक्कार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोकॉर्म, क्रेग यंग.
आरोपीला तात्काळ अटक पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाही.…
नागपूर : केरळ (Keral) राज्यातून आलेल्या कॅन्सर (Cancer) पीडित पत्नीच्या उपचारासाठी एक कुटुंब नागपूर शहरात…
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…