IND vs IRE: भारत वि आयर्लंड पहिली टी-२०, पाहा कधी, किती वाजता सुरू होणार सामना

मुंबई: दुखापतीमुळे ११ महिन्यांच्या सुट्टीनंतर संघात परतलेला जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडविरुद्ध (ireland) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. उद्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया (team india) मैदानात उतरणार आहे. आशिया कप आधी होणारी ही मालिका म्हणजे खेळाडूंची एक प्रकारची फिटनेस चाचणीच असणार आहे. आशिया कपच्या स्पर्धा या महिन्यातच ३० ऑगस्टला सुरू होत आहेत. त्यानंतर भारतात वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.


बुमराहसह सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा सारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. संजू सॅमसनवरही सर्वांच्या नजरा असतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामन्याबाबत जाणून घ्या सर्व काही...



भारत वि आयर्लंड पहिला टी-२० सामना


कधी : १८ ऑगस्ट शुक्रवार
कुठे: द व्हिलेज,डबलिन
वेळ : संध्याकाळी साडेसात वाजता
कुठे पाहू शकता : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-१ एचडी

संभाव्य प्लेईंग ११ 


भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(कर्णधार)

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग(कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, बेरी मॅक्कार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोकॉर्म, क्रेग यंग.
Comments
Add Comment

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड