IND vs IRE: भारत वि आयर्लंड पहिली टी-२०, पाहा कधी, किती वाजता सुरू होणार सामना

मुंबई: दुखापतीमुळे ११ महिन्यांच्या सुट्टीनंतर संघात परतलेला जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडविरुद्ध (ireland) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. उद्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया (team india) मैदानात उतरणार आहे. आशिया कप आधी होणारी ही मालिका म्हणजे खेळाडूंची एक प्रकारची फिटनेस चाचणीच असणार आहे. आशिया कपच्या स्पर्धा या महिन्यातच ३० ऑगस्टला सुरू होत आहेत. त्यानंतर भारतात वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.


बुमराहसह सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा सारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. संजू सॅमसनवरही सर्वांच्या नजरा असतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामन्याबाबत जाणून घ्या सर्व काही...



भारत वि आयर्लंड पहिला टी-२० सामना


कधी : १८ ऑगस्ट शुक्रवार
कुठे: द व्हिलेज,डबलिन
वेळ : संध्याकाळी साडेसात वाजता
कुठे पाहू शकता : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-१ एचडी

संभाव्य प्लेईंग ११ 


भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(कर्णधार)

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग(कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, बेरी मॅक्कार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोकॉर्म, क्रेग यंग.
Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे