मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसेची तोडफोड

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पनवेलमध्ये (panvel) घेतलेल्या कार्यक्रमानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे (mumbai-goa highway) काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मोठी तोडफोड केली. राज ठाकरे पनवेल येथील आपल्या भाषणादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनसैनिकांनीही कार्यालयाची तोडफोड करत आक्रमकता व्यक्त केली.



मनसैनिक आक्रमक


पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्यातील भाषणात बोलताना मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कार्यकर्त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्याचेही आदेश दिले होते. मात्र त्याचे पडसाद लगेचच उमटले. माणगाव येथील चेतक सन्नी कंपनीच्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.


भारताने चंद्रावर पाठवलेलं यान हे मुंबई-गोवा महामार्गावरून जायला हवं होतं. अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने बऱ्याच नागरिकांचा नाहक बळीही जातो. त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच मनसैनिकांना आंदोलन करण्याचे आदेश दिले होते.


मुंबई गोवा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला मात्र रस्ता काही झाला नाही. अद्यापही रस्ता झालेला नाही. या मार्गावर अडीच हजाराहून अधिक जणांचे बळी गेले अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली. त्यांनी आपल्या या भाषणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष