मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसेची तोडफोड

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पनवेलमध्ये (panvel) घेतलेल्या कार्यक्रमानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे (mumbai-goa highway) काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मोठी तोडफोड केली. राज ठाकरे पनवेल येथील आपल्या भाषणादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनसैनिकांनीही कार्यालयाची तोडफोड करत आक्रमकता व्यक्त केली.



मनसैनिक आक्रमक


पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्यातील भाषणात बोलताना मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कार्यकर्त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्याचेही आदेश दिले होते. मात्र त्याचे पडसाद लगेचच उमटले. माणगाव येथील चेतक सन्नी कंपनीच्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.


भारताने चंद्रावर पाठवलेलं यान हे मुंबई-गोवा महामार्गावरून जायला हवं होतं. अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने बऱ्याच नागरिकांचा नाहक बळीही जातो. त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच मनसैनिकांना आंदोलन करण्याचे आदेश दिले होते.


मुंबई गोवा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला मात्र रस्ता काही झाला नाही. अद्यापही रस्ता झालेला नाही. या मार्गावर अडीच हजाराहून अधिक जणांचे बळी गेले अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली. त्यांनी आपल्या या भाषणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी