मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसेची तोडफोड

  133

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पनवेलमध्ये (panvel) घेतलेल्या कार्यक्रमानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे (mumbai-goa highway) काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मोठी तोडफोड केली. राज ठाकरे पनवेल येथील आपल्या भाषणादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनसैनिकांनीही कार्यालयाची तोडफोड करत आक्रमकता व्यक्त केली.



मनसैनिक आक्रमक


पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्यातील भाषणात बोलताना मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कार्यकर्त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्याचेही आदेश दिले होते. मात्र त्याचे पडसाद लगेचच उमटले. माणगाव येथील चेतक सन्नी कंपनीच्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.


भारताने चंद्रावर पाठवलेलं यान हे मुंबई-गोवा महामार्गावरून जायला हवं होतं. अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने बऱ्याच नागरिकांचा नाहक बळीही जातो. त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच मनसैनिकांना आंदोलन करण्याचे आदेश दिले होते.


मुंबई गोवा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला मात्र रस्ता काही झाला नाही. अद्यापही रस्ता झालेला नाही. या मार्गावर अडीच हजाराहून अधिक जणांचे बळी गेले अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली. त्यांनी आपल्या या भाषणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत