६ रूपये सुट्टे न दिल्याने गमावली सरकारी नोकरी, कोर्टाकडूनही दिलासा नाही

मुंबई: प्रवाशांचे ६ रूपये परत न केल्याने रेल्वेतील एका बुकिंग क्लार्कला (booking clerk) आपली नोकरी गमवावी लागली. आता मुंबई उच्च न्यायालयानेही (mumbai high court) या क्लार्कला दिलासा देण्यास नकार दिला आहे. २६ वर्षांपूर्वी दक्षता विभागाने छापेमारीमध्ये पकडल्यानंतर या क्लार्कला कामावरून बर्खास्त करण्यात आले होते.


मुंबईतील ही पूर्ण घटना आहे. ३१ जुलै १९९५ला राजेश वर्मा रेल्वेत क्लार्क म्हणून लागलो होते. ३० ऑगस्ट १९९७ला वर्मा कुर्ला टर्मिनस जंक्शन मुंबईमध्ये संगणीकृत करंट बुकिंग कार्यालयात प्रवाशांची तिकीटे बुक करत होते. त्यावेळी दक्षता विभागाने रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबलला नकली प्रवासी बनवून क्लार्क राजेश वर्मा यांच्या काऊंटरकडे पाठवले. खिडकीवर जाऊन त्यांनी कुर्ला टर्मिनस ते आरा(बिहार ) हे तिकीट मागवले. याचे भाडे २१४ रूपये इतके होते. यावेळी प्रवाशाने ५०० रूपये दिले. वर्मा यांनी २८६ रूपये परत करायचे होते. मात्र त्यांनी केवळ २८० रूपये परत दिले. ६ रूपये कमी दिले.


यानंतर दक्षता विभागाने बुकिंग क्लार्क राजेश वर्माच्या तिकीट काऊंटरवर छापा मारला. मात्र तिकीट विक्रीच्या हिशेबाने त्याच्या रेल्वे कॅशमध्ये ५८ रूपये कमी मिळाले. तर क्लार्क सीटच्या मागे ठेवलेल्या कपाटातून ४५० रूपये मिळाले. दक्षता विभागाच्या माहितीनुसार ही रक्कम वर्माने प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल करत मिळवली होती.


वर्माविरोधात तपास जारी करण्यात आला. याचा रिपोर्ट ३१ जानेवारी २००२मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आणि नोकरीवरून काढून टाकण्यात आले. वर्मा यांनी या आदेशाला आव्हान दिले. मात्र ते फेटाळण्यात आले. वर्मा २३ ऑगस्ट २००२मध्ये पुनरीक्षण प्राधिकरणासमोर गेले. १७ फेब्रुवारी २००३मध्ये त्यांची दया याचिकाही फेटाळण्यात आली.


वर्मा यांच्या बाजूने वकील मिहिर देसाई यांनी न्यायालयासमोर मांडले की सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने प्रवाशाला ६ रूपये लगेचच परत करता आले नाही. त्यानंतर प्रवाशाला ६ रूपये देण्यासाठी थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र वर्मा यांच्या वकिलाचा दावा कोर्टाने पूर्णपणे फेटाळून लावत त्यांच्याविरोधात निकाल दिला. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानेही वर्मा यांना कोणताही दिलासा न देता त्यांच्यावरील आरोप कायम ठेवले आहेत.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर