राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, स्वातंत्र्यदिनी घडली दुर्घटना

मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी आणि त्याआधी आलेली शनिवारी रविवारची सुट्टी अशा लाँग वीकेंडमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी देणे पसंत केले. राज्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ही सुट्टी एका तरूणाच्या जीवावर बेतली.


राजगडावर फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा तेथीलच पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळेस ही दुर्घटना घडली.पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. अजय मोहन कल्लामपारा असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो ३३ वर्षांचा होता.


अजय ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहत होता. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. सलग सुट्टी आल्याने अजय आपल्या मित्रांसोबत किल्ल्यावर फिरायला आला होता. तो आणि त्याचे मित्र असे चौघेजण किल्ल्यावर आले होते.



कशी घडली दुर्घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मित्रांसोबत सोमवारी किल्ल्यावर होता. सोमवारच्या रात्री तो किल्ल्यावरील पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला. मात्र पाणी काढत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीच्या वेळेस काळोख असल्याने अजय कुठे गेला याचा शोध काही त्याच्या मित्रांना लागेना. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. सकाळी जेव्हा त्यांनी पुन्हा अजयला शोधले तेव्हा त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत होता.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना