राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, स्वातंत्र्यदिनी घडली दुर्घटना

मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी आणि त्याआधी आलेली शनिवारी रविवारची सुट्टी अशा लाँग वीकेंडमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी देणे पसंत केले. राज्यात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ही सुट्टी एका तरूणाच्या जीवावर बेतली.


राजगडावर फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा तेथीलच पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळेस ही दुर्घटना घडली.पुण्याच्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका तरूणाचा मृत्यू झाला. अजय मोहन कल्लामपारा असे या मृत तरूणाचे नाव आहे. तो ३३ वर्षांचा होता.


अजय ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहत होता. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता. सलग सुट्टी आल्याने अजय आपल्या मित्रांसोबत किल्ल्यावर फिरायला आला होता. तो आणि त्याचे मित्र असे चौघेजण किल्ल्यावर आले होते.



कशी घडली दुर्घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा मित्रांसोबत सोमवारी किल्ल्यावर होता. सोमवारच्या रात्री तो किल्ल्यावरील पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला. मात्र पाणी काढत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीच्या वेळेस काळोख असल्याने अजय कुठे गेला याचा शोध काही त्याच्या मित्रांना लागेना. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. सकाळी जेव्हा त्यांनी पुन्हा अजयला शोधले तेव्हा त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत होता.

Comments
Add Comment

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

POP Ganesh Idol Ban Decision 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

Pradhan Mantri pik vima yojana : एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढली

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri pik vima yojana) सहभागी

Annabhau Sathe Jayanti : जाणून घेऊया; दीड दिवस शाळा शिकलेल्या लोकशाहिराचा जीवनप्रवास

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने १

Lokmany Tilak Speech: लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त; तयार भाषण नमुना

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. १ ऑगस्ट १९२० रोजी