Sujay Vikhe : तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्यात काय सुरू होतं?

  62

खासदार सुजय विखेंची बोचरी टीका


अहमदनगर : पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय हेच कळलं नाही तर त्यांना अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील गुप्त बैठकीची माहिती असावी हा एक मोठा विनोदच आहे, अशी बोचरी टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचे भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार सुजय विखे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी जेवढे महाराष्ट्राचे कल्याण करायचे तेवढे पुरे झाले, आता उगाच माध्यमांची प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका टिपण्णी करू नये, असा सल्ला यावेळी विखे यांनी चव्हाण यांना दिला.


हर घर तिरंगा या उपक्रमासाठी आज नगर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, महेंद्र गंधे, बाबासाहेब वाकळे, अरुण मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या