Mi Nathuram Godse boltoy : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक पुन्हा रंगभूमीवर; पण…

Share

शरद पोंक्षे यांची घोषणा

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Mi Nathuram Godse boltoy) या नाटकामुळेही त्यांना अनेक टीकांना सामोरे जावे लागले. मात्र बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे ते या नाटकाचे ५००च्या वर प्रयोग करु शकले. काही काळापूर्वी ते आजारपणानंतर ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून पुन्हा रंगभूमीवर आले होते. यानंतर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक तब्बल साडेपाच वर्षांनी ते पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. आजच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही घोषणा केली आहे.

शरद पोंक्षे यांनी ११ मार्च २०१८ ला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा हे नाटक न करण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे साडेपाच वर्षे या नाटकाचा प्रयोग होऊ शकला नाही. मात्र लोकांच्या विनंतीनुसार हे नाटक पुन्हा आणण्याचं पोंक्षे यांनी ठरवलं आहे. या नाटकाचं दिग्दर्शन दिवंगत अभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांनी केलं होतं. हे नाटक पुन्हा येत असलं तरी केवळ ५० प्रयोगांपुरतं मर्यादित राहणार आहे.

शरद पोंक्षे म्हणतात…

या नाटकात नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे यांनी पोस्टद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, मी तुम्हाला आज एक अतिशय आनंदाची बातमी देणार आहे. मी ११ मार्च २०१८ ला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही. पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते.

शरद पोंक्षे पुढे म्हणतात, त्यानंतर मग मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही. त्यामुळेच मग फक्त ५० प्रयोगांसाठी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मी या नाटकाचे प्रयोग करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

36 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago