शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने झालेल्या दुर्घटनेमुळे तब्बल ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील १४ लोकांचा मृत्यू सिमलामध्ये झालेल्या भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील काही ठिकाणी भूस्सखलन ाले. यामुळे अनेक रस्ते बंद झाले तर काही घरे कोसळली. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सिमल्यामधील समर हिल परिसरातील शिवमंदिरात भूस्सखलन झाल्याने मोठ्या प्रमाणात लोक तेथे मलब्याखाली दबले गेले. श्रावण महिना सुरू असल्याने यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिमल्यात भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये कमीत कमी १४ लोकांचा मृत्यू झाला. यात समर हिल परिसरातील शिव मंदिर आणि फागली भागातील आणखी एका ठिकाणी झालेल्या भूस्सखलनानंतर मलब्याखालून ९ शव बाहेर काढण्यात आले.
राज्याच्या आपतकालीन विभागाच्या माहितीनुसार राज्यातील ७५२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने सोमवापी कुल्लू, किन्नोर आणि लाहोल स्पिती सोडून राज्यातील १२ जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यात मंगळवारी पिवळा अलर्ट जाहीर केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलन जिल्ह्यातील जादोन गावात आभाळ फाटल्याने रविवारी रात्री एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आभाळ फाटल्याने दोन बंगले वाहून गेले. या दुर्घटनेत सहा जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सात जणांचा म-त्यू झाला.
हिमाचल प्रदेशात झालेल्या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ज्या ठिकाणी भूस्सखलन झाले आहे तेथे दबलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…