हिमाचलमध्ये पावसाचा कहर, ५० हून अधिकांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने झालेल्या दुर्घटनेमुळे तब्बल ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील १४ लोकांचा मृत्यू सिमलामध्ये झालेल्या भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील काही ठिकाणी भूस्सखलन ाले. यामुळे अनेक रस्ते बंद झाले तर काही घरे कोसळली. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.



शिव मंदिरात भूस्सखलन


सिमल्यामधील समर हिल परिसरातील शिवमंदिरात भूस्सखलन झाल्याने मोठ्या प्रमाणात लोक तेथे मलब्याखाली दबले गेले. श्रावण महिना सुरू असल्याने यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिमल्यात भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये कमीत कमी १४ लोकांचा मृत्यू झाला. यात समर हिल परिसरातील शिव मंदिर आणि फागली भागातील आणखी एका ठिकाणी झालेल्या भूस्सखलनानंतर मलब्याखालून ९ शव बाहेर काढण्यात आले.



९ जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट


राज्याच्या आपतकालीन विभागाच्या माहितीनुसार राज्यातील ७५२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने सोमवापी कुल्लू, किन्नोर आणि लाहोल स्पिती सोडून राज्यातील १२ जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यात मंगळवारी पिवळा अलर्ट जाहीर केला आहे.



सोलनच्या जादोनमध्ये आभाळ फाटले, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलन जिल्ह्यातील जादोन गावात आभाळ फाटल्याने रविवारी रात्री एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आभाळ फाटल्याने दोन बंगले वाहून गेले. या दुर्घटनेत सहा जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सात जणांचा म-त्यू झाला.



अमित शहांनी व्यक्त केला शोक


हिमाचल प्रदेशात झालेल्या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ज्या ठिकाणी भूस्सखलन झाले आहे तेथे दबलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली


Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन