मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कळवा रुग्णालयाला दिली भेट

  190

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील कळवा शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात एकाच दिवसात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात रविवारी एका महिन्याच्या बाळासह आणखी चार जण दगावले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तेथील रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच अपेक्षित बदलही सुचवले.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबतची कारणे जाणून घेतली. तसेच तेथील उपस्थित डॉक्टरांकडून उपचारांबाबतची माहिती घेतली. दरम्यान, रुग्णालयात घडलेले हे मृ्त्यू दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच येत्या २५ ऑगस्टला याबाबत नेमलेल्या समितीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


दरम्यान, या दुर्घटनेचे कोणीही राजकारण करू नये असेही त्यांनी सांगितले. येथील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना बरे करण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यांमुळे अशा घटनांचे राजकारण करून तेथील अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाऊ नये. त्यासोबतच अशा दुर्घटना महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी यंत्रण सजग राहील असेही आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.माळेगावकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.



मनसे झाली आक्रमक


दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी केली होती.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती