Bindeshwar Pathak passed away: सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

  196

पंतप्रधान मोदींसह देशभरातून हळहळ व्यक्त


नवी दिल्ली : जगाला शौचालयाचं महत्त्व समजावून सांगणारे आणि कोट्यावधी लोकांचं जगणं सोपे करणारे सुलभ इंटरनॅशनलचे (Sulabh International) संस्थापक बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांनी आज जगाचा निरोप घेतला. देशातील प्रत्येक शहरात आपण जे सुलभ शौचालय पाहतोय त्यात बिंदेश्वर पाठक यांचेच योगदान आहे. सुलभ शौचालयाला इंटरनॅशनल ब्रँड त्यांनी बनवले. आज दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजच्या स्वातंत्र्यदिनी झालेल्या या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.


आज सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. बिंदेश्वर पाठक यांचे देशातील स्वच्छता मोहिमेत देखील मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या सुलभ इंटरनॅशनलची देशभरात सुमारे ८५०० शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी ५ रुपये आणि आंघोळीसाठी १० रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठी मोफत ठेवण्यात आले आहेत.


डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानले. गेल्या ५० वर्षांत त्यांनी हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या मानवी हक्कांसाठी अथक परिश्रम केले. हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन करणे, कौशल्य विकासाद्वारे पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे, आदी त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट होते. डॉ.बिंदेश्वर पाठक यांनी शांतता, सहिष्णुता आणि सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देण्याचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.



कसा होता बिंदेश्वर पाठक यांचा प्रवास?


बिंदेश्वर पाठक अशा घरात वाढले जिथे ९ खोल्या होत्या, परंतु एकही शौचालय नव्हते. घरातील महिला सकाळी लवकर उठून बाहेर शेतावर जात. दिवसभर शौचास जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे अनेक समस्या आणि आजार मागे लागायचे. हे चित्र बिंदेश्वर पाठक यांना अस्वस्थ करायचे. या समस्येवर तोडगा काढायचा असं त्यांनी ठरवलं. स्वच्छता क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलं आणि देशात एक मोठा बदल घडला. त्याकाळी एका उच्च जातीतील पदवीधर मुलाने शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. परंतु ते ध्येयापासून मागे हटले नाहीत.


बिंदेश्वर यांचे वडील, सासरे या सगळ्यांचाच त्यांच्या कामाला विरोध होता, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. १९७० मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संघटना होती. सुलभ इंटरनॅशनलने २ खड्ड्यांचे फ्लॅश टॉयलेट विकसित केले. डिस्पोजल कम्पोस्ट शौचालयाचा अविष्कार त्यांनी केला. हे काम त्यांनी इतक्या कमी खर्चात आसपास मिळणाऱ्या सामानातून केले. त्यानंतर देशभरात सुलभ शौचालय बनवण्यास सुरूवात केली. पाठक यांच्या कामगिरीने भारतात त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त


डॉ. बिंदेश्वर पाठक जी यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते एक द्रष्टे होते ज्यांनी सामाजिक प्रगती आणि दीनदुबळ्यांना सशक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. बिंदेश्वरजींनी स्वच्छ भारत घडवणे हे आपले ध्येय बनवले. त्यांनी स्वच्छ भारत मिशनला मोलाचे सहकार्य केले. आमच्या विविध संभाषणांमध्ये त्यांची स्वच्छतेबद्दलची तळमळ नेहमीच दिसून येत होती. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील. असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मागून येत होते धुराचे लोट, आगीच्या लोळामधून एकटे बाहेर पडले विश्वास कुमार, पाहा VIDEO

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी १२ जूनला एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे एक विमान जे लंडनला

plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आदी १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता १५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण