Big Boss OTT2: एल्विश यादवने रचला इतिहास, वाईल्ड कार्ड स्पर्धक जिंकला स्पर्धा

मुंबई: सलमान खानचा (salman khan)चा शो बिग बॉस ओटीटी २ (BIg Boss OTT2) अनेक दिवसांपासून चर्चेत होता. लोकांना या शोच्या ग्रँड फिनालेची उत्सुकता होती. अखेर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. शोला १४ ऑगस्टला आपला विजेता मिळाला. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवने ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला.


यात पहिल्यांदा असे घडले की एखाद्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाला बिग बॉसची विजयी ट्रॉफी मिळाली. त्याला बिग बॉस ओटीटी २ची ट्रॉफी आणि २५ लाख रूपये मिळाले. या स्पर्धेत अभिषेक मल्हानही होता. सलमान खानच्या या शोमध्ये अभिषेक पहिला रनर अप ठरला. तर मनीषा राणी दुसरी रनर अप ठरली.


 


एल्विश यादवने या हंगामात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेय की एखादा वाईल्ड कार्ड स्पर्धकाने हा शो जिंकला आहे. एल्विश यादवने आपली ही ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनीषा रानी यांना अर्पित केली. बिग बॉस ओटीटीच्या टॉप ५मध्ये एल्विश यादवसह अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पुजा भट्ट होती.


१७ जूनला बिग बॉस ओटीटीचे हे दुसरे पर्व सुरू झाले होते. यात १६ स्पर्धक सहभागी होती. हे सगळेच स्पर्धक लोकप्रिय होते.

Comments
Add Comment

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या