Big Boss OTT2: एल्विश यादवने रचला इतिहास, वाईल्ड कार्ड स्पर्धक जिंकला स्पर्धा

मुंबई: सलमान खानचा (salman khan)चा शो बिग बॉस ओटीटी २ (BIg Boss OTT2) अनेक दिवसांपासून चर्चेत होता. लोकांना या शोच्या ग्रँड फिनालेची उत्सुकता होती. अखेर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. शोला १४ ऑगस्टला आपला विजेता मिळाला. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवने ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला.


यात पहिल्यांदा असे घडले की एखाद्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाला बिग बॉसची विजयी ट्रॉफी मिळाली. त्याला बिग बॉस ओटीटी २ची ट्रॉफी आणि २५ लाख रूपये मिळाले. या स्पर्धेत अभिषेक मल्हानही होता. सलमान खानच्या या शोमध्ये अभिषेक पहिला रनर अप ठरला. तर मनीषा राणी दुसरी रनर अप ठरली.


 


एल्विश यादवने या हंगामात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेय की एखादा वाईल्ड कार्ड स्पर्धकाने हा शो जिंकला आहे. एल्विश यादवने आपली ही ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनीषा रानी यांना अर्पित केली. बिग बॉस ओटीटीच्या टॉप ५मध्ये एल्विश यादवसह अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पुजा भट्ट होती.


१७ जूनला बिग बॉस ओटीटीचे हे दुसरे पर्व सुरू झाले होते. यात १६ स्पर्धक सहभागी होती. हे सगळेच स्पर्धक लोकप्रिय होते.

Comments
Add Comment

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा