77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली: भारताचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन. ज्या देशभक्तांनी आपले रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस. संपूर्ण देश या देशभक्तीच्या रंगात आज रंगला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाची तयारीही पूर्ण झाली आहे. येथे आज पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी लाल किल्ल्यावरील त्यांचे हे शेवटचे भाषण असेल.लाल किल्ल्यावर पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरिधर अरामने त्यांचे स्वागत करतली. पीएम यांच्या गार्ड ऑफ ऑनर दलात सेना, नौसेना आणि दिल्ली पोलिसांचे एकएक अधिकारी सामील असतील.



असा असेल कार्यक्रम


सकाळी ७.०६ वाजता - पंतप्रधान राजघाट येथे पोहोचल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणार
सकाळी ७.०८ वाजता - संरक्षण राज्य मंत्री पोहोचतील.
सकाळी ७.११ वाजता - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील.
सकाळी ७.१८ वाजता - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन. आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार.
सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील. यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
सकाळी ७.३३ वाजता - पंतप्रधान देशाला संबोधित करतील.


सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावल्यानंतर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वार्षिक कार्यक्रमात सरकार आपले रिपोर्ट कार्ड, तसेच प्रमुख योजनांचे अनावरण आणि देशासाठी आपला भावी दृष्टिकोन या मुद्द्यांवर बोलतील.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने