77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली: भारताचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन. ज्या देशभक्तांनी आपले रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस. संपूर्ण देश या देशभक्तीच्या रंगात आज रंगला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाची तयारीही पूर्ण झाली आहे. येथे आज पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी लाल किल्ल्यावरील त्यांचे हे शेवटचे भाषण असेल.लाल किल्ल्यावर पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरिधर अरामने त्यांचे स्वागत करतली. पीएम यांच्या गार्ड ऑफ ऑनर दलात सेना, नौसेना आणि दिल्ली पोलिसांचे एकएक अधिकारी सामील असतील.



असा असेल कार्यक्रम


सकाळी ७.०६ वाजता - पंतप्रधान राजघाट येथे पोहोचल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणार
सकाळी ७.०८ वाजता - संरक्षण राज्य मंत्री पोहोचतील.
सकाळी ७.११ वाजता - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील.
सकाळी ७.१८ वाजता - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन. आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार.
सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील. यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
सकाळी ७.३३ वाजता - पंतप्रधान देशाला संबोधित करतील.


सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावल्यानंतर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वार्षिक कार्यक्रमात सरकार आपले रिपोर्ट कार्ड, तसेच प्रमुख योजनांचे अनावरण आणि देशासाठी आपला भावी दृष्टिकोन या मुद्द्यांवर बोलतील.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च