77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली: भारताचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन. ज्या देशभक्तांनी आपले रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस. संपूर्ण देश या देशभक्तीच्या रंगात आज रंगला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाची तयारीही पूर्ण झाली आहे. येथे आज पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी लाल किल्ल्यावरील त्यांचे हे शेवटचे भाषण असेल.लाल किल्ल्यावर पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरिधर अरामने त्यांचे स्वागत करतली. पीएम यांच्या गार्ड ऑफ ऑनर दलात सेना, नौसेना आणि दिल्ली पोलिसांचे एकएक अधिकारी सामील असतील.



असा असेल कार्यक्रम


सकाळी ७.०६ वाजता - पंतप्रधान राजघाट येथे पोहोचल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणार
सकाळी ७.०८ वाजता - संरक्षण राज्य मंत्री पोहोचतील.
सकाळी ७.११ वाजता - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील.
सकाळी ७.१८ वाजता - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन. आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार.
सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील. यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
सकाळी ७.३३ वाजता - पंतप्रधान देशाला संबोधित करतील.


सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावल्यानंतर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वार्षिक कार्यक्रमात सरकार आपले रिपोर्ट कार्ड, तसेच प्रमुख योजनांचे अनावरण आणि देशासाठी आपला भावी दृष्टिकोन या मुद्द्यांवर बोलतील.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात