कळवा रुग्णालयात एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

मुंबई: ठाणे महानगरपालि्केच्या(TMC) कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या संपत नाहीये. त्यातच सोमवारी चार रुग्ण (patient) दगावले. धक्कादायक या रुग्णांमध्ये एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या शासकीय रुग्णालयात गेल्या चोवीस तासात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.



मृत्यू सत्र कायम


रात्री बारा वाजल्यापासून या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. यामध्ये सगळ्यात वेदनादायी म्हणजे नुकतेच या जगात आलेले असे केवळ एक महिन्याचे बाळ आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयाती या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.


याआधी याच रुग्णालयात रविवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. या १८ झालेल्या मृत्यूंपैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तसेच ४ रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते. तसेच याआधी एकाच दिवशी या रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला होता.



मनसे झाली आक्रमक


दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक