कळवा रुग्णालयात एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

  154

मुंबई: ठाणे महानगरपालि्केच्या(TMC) कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या संपत नाहीये. त्यातच सोमवारी चार रुग्ण (patient) दगावले. धक्कादायक या रुग्णांमध्ये एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या शासकीय रुग्णालयात गेल्या चोवीस तासात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.



मृत्यू सत्र कायम


रात्री बारा वाजल्यापासून या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. यामध्ये सगळ्यात वेदनादायी म्हणजे नुकतेच या जगात आलेले असे केवळ एक महिन्याचे बाळ आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयाती या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.


याआधी याच रुग्णालयात रविवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. या १८ झालेल्या मृत्यूंपैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तसेच ४ रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते. तसेच याआधी एकाच दिवशी या रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला होता.



मनसे झाली आक्रमक


दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या