कळवा रुग्णालयात एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

मुंबई: ठाणे महानगरपालि्केच्या(TMC) कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या संपत नाहीये. त्यातच सोमवारी चार रुग्ण (patient) दगावले. धक्कादायक या रुग्णांमध्ये एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या शासकीय रुग्णालयात गेल्या चोवीस तासात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.



मृत्यू सत्र कायम


रात्री बारा वाजल्यापासून या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. यामध्ये सगळ्यात वेदनादायी म्हणजे नुकतेच या जगात आलेले असे केवळ एक महिन्याचे बाळ आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयाती या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.


याआधी याच रुग्णालयात रविवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. या १८ झालेल्या मृत्यूंपैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तसेच ४ रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते. तसेच याआधी एकाच दिवशी या रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला होता.



मनसे झाली आक्रमक


दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध