कळवा रुग्णालयात एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

मुंबई: ठाणे महानगरपालि्केच्या(TMC) कळवा (kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या संपत नाहीये. त्यातच सोमवारी चार रुग्ण (patient) दगावले. धक्कादायक या रुग्णांमध्ये एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या शासकीय रुग्णालयात गेल्या चोवीस तासात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली.



मृत्यू सत्र कायम


रात्री बारा वाजल्यापासून या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. यामध्ये सगळ्यात वेदनादायी म्हणजे नुकतेच या जगात आलेले असे केवळ एक महिन्याचे बाळ आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयाती या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.


याआधी याच रुग्णालयात रविवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. या १८ झालेल्या मृत्यूंपैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तसेच ४ रुग्ण हे जनरल वॉर्डमधील होते. तसेच याआधी एकाच दिवशी या रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला होता.



मनसे झाली आक्रमक


दरम्यान, कळवा येथील मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यांनी यावेळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच या घटनेची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे