Rain Updates : दिल्लीत हलक्या पावसाच्या सरी, तर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट

  136

बिहारमधील ९ जिल्ह्यांनाही अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा


नवी दिल्ली : राज्याच्या काही भागात पावसाने उसंती घेतली असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.


हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस असेल. मात्र, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


तर उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडूनमध्ये १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


बिहारमधील ९ जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्रातील कोकण विभाग, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


राजस्थानमध्ये १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र १५ ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १५ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात १३ आणि १४ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पुढील सात दिवसांत उर्वरित वायव्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या भागांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे