नवी दिल्ली : राज्याच्या काही भागात पावसाने उसंती घेतली असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस असेल. मात्र, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडूनमध्ये १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमधील ९ जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्रातील कोकण विभाग, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र १५ ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १५ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात १३ आणि १४ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील सात दिवसांत उर्वरित वायव्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या भागांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…