PM Modi : ईव्हीएम मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फटकारले

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम - EVM) वरून विरोधी पक्षांवर टीका केली आणि ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केला.


पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या क्षेत्रीय पंचायती राज परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदींनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वरून विरोधकांवर हल्ला चढवला आणि ते म्हणाले, “जे स्वत:ला लोकशाहीचे चॅम्पियन म्हणून दाखवतात, तेच ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचत आहेत.”


मणिपूर हिंसाचारावर या आठवड्यात संसदेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, अविश्वासाच्या वेळी विरोधक केवळ आरोप करत होते. ते कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. खरं तर विरोधी पक्षांना मणिपूरवर चर्चा करायची नव्हती आणि म्हणूनच ते लोकसभेत कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. आम्ही लोकसभेत विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि संपूर्ण देशात नकारात्मकता पसरवणा-यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह (लोकसभा) मध्येच सोडले आणि केवळ गोंधळ निर्माण झाला.


"सत्य हे आहे की ते अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले होते ...," मोदींनी भाजप कार्यकर्त्याला सांगितले, जेथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते.


“सत्य हे आहे की विरोधक अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले. मतदान झाले असते तर 'घमंडिया' (अभिमानी) युती उघडकीस आली असती," अशी चपराक मोदी यांनी विरोधकांना लगावली.


विरोधी पक्षाचे लोक संसदेतून पळून गेले, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे, असे मोदी म्हणाले.


मोदींनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारवरही टीका केली आणि सत्ताधारी पक्ष विरोधकांना, विशेषत: भाजपला घाबरवण्यासाठी दहशतवादाचे राज्य करत असल्याचा आरोप केला.


"भाजपचे सदस्य अहंकार न बाळगता काम करतात आणि लोकांची मने जिंकत आहेत," असे मोदी म्हणाले.


"पंचायत निवडणुकीत बंगालमध्ये विरोधकांचे काय झाले नाही - वेळ न देता मतदानाची घोषणा करणे, उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ न देणे, उमेदवारी दाखल करताना त्यांच्यावर हल्ले करणे, विरोधक आणि त्यांच्या नातेवाईकांना धमकावणे आणि त्यांची हत्या करणे," मोदींनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले. म्हणाले, "हे देशाने पाहिले आणि लक्षात घेतले आहे".


"बंगाल, विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून हिंसाचाराचा वापर केला जात आहे. लोकशाहीबद्दल बोलणा-या टीएमसीचा पंचायत निवडणुकीत पर्दाफाश झाला आहे, असे मोदींनी निदर्शनास आणले.


"धमक्या असूनही बंगालमध्ये अलीकडील ग्रामीण निवडणुका जिंकलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात