कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम – EVM) वरून विरोधी पक्षांवर टीका केली आणि ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केला.
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या क्षेत्रीय पंचायती राज परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदींनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वरून विरोधकांवर हल्ला चढवला आणि ते म्हणाले, “जे स्वत:ला लोकशाहीचे चॅम्पियन म्हणून दाखवतात, तेच ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचत आहेत.”
मणिपूर हिंसाचारावर या आठवड्यात संसदेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, अविश्वासाच्या वेळी विरोधक केवळ आरोप करत होते. ते कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. खरं तर विरोधी पक्षांना मणिपूरवर चर्चा करायची नव्हती आणि म्हणूनच ते लोकसभेत कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. आम्ही लोकसभेत विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि संपूर्ण देशात नकारात्मकता पसरवणा-यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह (लोकसभा) मध्येच सोडले आणि केवळ गोंधळ निर्माण झाला.
“सत्य हे आहे की ते अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले होते …,” मोदींनी भाजप कार्यकर्त्याला सांगितले, जेथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते.
“सत्य हे आहे की विरोधक अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले. मतदान झाले असते तर ‘घमंडिया’ (अभिमानी) युती उघडकीस आली असती,” अशी चपराक मोदी यांनी विरोधकांना लगावली.
विरोधी पक्षाचे लोक संसदेतून पळून गेले, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे, असे मोदी म्हणाले.
मोदींनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारवरही टीका केली आणि सत्ताधारी पक्ष विरोधकांना, विशेषत: भाजपला घाबरवण्यासाठी दहशतवादाचे राज्य करत असल्याचा आरोप केला.
“भाजपचे सदस्य अहंकार न बाळगता काम करतात आणि लोकांची मने जिंकत आहेत,” असे मोदी म्हणाले.
“पंचायत निवडणुकीत बंगालमध्ये विरोधकांचे काय झाले नाही – वेळ न देता मतदानाची घोषणा करणे, उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ न देणे, उमेदवारी दाखल करताना त्यांच्यावर हल्ले करणे, विरोधक आणि त्यांच्या नातेवाईकांना धमकावणे आणि त्यांची हत्या करणे,” मोदींनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले. म्हणाले, “हे देशाने पाहिले आणि लक्षात घेतले आहे”.
“बंगाल, विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून हिंसाचाराचा वापर केला जात आहे. लोकशाहीबद्दल बोलणा-या टीएमसीचा पंचायत निवडणुकीत पर्दाफाश झाला आहे, असे मोदींनी निदर्शनास आणले.
“धमक्या असूनही बंगालमध्ये अलीकडील ग्रामीण निवडणुका जिंकलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…