PM Modi : ईव्हीएम मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फटकारले

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम - EVM) वरून विरोधी पक्षांवर टीका केली आणि ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केला.


पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या क्षेत्रीय पंचायती राज परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदींनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वरून विरोधकांवर हल्ला चढवला आणि ते म्हणाले, “जे स्वत:ला लोकशाहीचे चॅम्पियन म्हणून दाखवतात, तेच ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचत आहेत.”


मणिपूर हिंसाचारावर या आठवड्यात संसदेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, अविश्वासाच्या वेळी विरोधक केवळ आरोप करत होते. ते कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. खरं तर विरोधी पक्षांना मणिपूरवर चर्चा करायची नव्हती आणि म्हणूनच ते लोकसभेत कोणत्याही तर्काशिवाय बोलत होते. आम्ही लोकसभेत विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि संपूर्ण देशात नकारात्मकता पसरवणा-यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृह (लोकसभा) मध्येच सोडले आणि केवळ गोंधळ निर्माण झाला.


"सत्य हे आहे की ते अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले होते ...," मोदींनी भाजप कार्यकर्त्याला सांगितले, जेथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते.


“सत्य हे आहे की विरोधक अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास घाबरले. मतदान झाले असते तर 'घमंडिया' (अभिमानी) युती उघडकीस आली असती," अशी चपराक मोदी यांनी विरोधकांना लगावली.


विरोधी पक्षाचे लोक संसदेतून पळून गेले, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे, असे मोदी म्हणाले.


मोदींनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारवरही टीका केली आणि सत्ताधारी पक्ष विरोधकांना, विशेषत: भाजपला घाबरवण्यासाठी दहशतवादाचे राज्य करत असल्याचा आरोप केला.


"भाजपचे सदस्य अहंकार न बाळगता काम करतात आणि लोकांची मने जिंकत आहेत," असे मोदी म्हणाले.


"पंचायत निवडणुकीत बंगालमध्ये विरोधकांचे काय झाले नाही - वेळ न देता मतदानाची घोषणा करणे, उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ न देणे, उमेदवारी दाखल करताना त्यांच्यावर हल्ले करणे, विरोधक आणि त्यांच्या नातेवाईकांना धमकावणे आणि त्यांची हत्या करणे," मोदींनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले. म्हणाले, "हे देशाने पाहिले आणि लक्षात घेतले आहे".


"बंगाल, विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून हिंसाचाराचा वापर केला जात आहे. लोकशाहीबद्दल बोलणा-या टीएमसीचा पंचायत निवडणुकीत पर्दाफाश झाला आहे, असे मोदींनी निदर्शनास आणले.


"धमक्या असूनही बंगालमध्ये अलीकडील ग्रामीण निवडणुका जिंकलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन