Har ghar Tiranga : पुन्हा प्रत्येक घरावर दिसणार तिरंगा! पंतप्रधान मोदींच्या ट्विटची सर्वत्र चर्चा...

काय आहे हे ट्विट?


नवी दिल्ली : स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना (75 years of Independence) भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात 'हर घर तिरंगा' (Har ghar Tiranga) ही मोहिम सुरु केली होती. या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनादिवशी (Independence Day) प्रत्येक घराच्या खिडकीत एक तिरंगा फडकताना दिसत होता. भारतासाठी अभिमानास्पद असे ते चित्र होते. मात्र केवळ एकच वर्ष ही मोहिम न राबवता यंदाच्या वर्षीही 'हर घर तिरंगा' दिसावा असा पंतप्रधान मोदींचा मानस आहे. यंदाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनादिवशी पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दोन ट्विट्स केली आहेत. या ट्विट्समध्ये ते म्हणतात, तिरंगा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला पुढे राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. 'हर घर तिरंगा' मोहिमेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे. देशवासियांना यंदा ही मोहीम एका नव्या उंचीवर न्यायची आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशाच्या अभिमानाचे आणि अभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकावू या. तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी https://harghartiranga.com वर अपलोड करा, असे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी या मोहिमेमुळे सुमारे ५०० कोटींचे तिरंगे खरेदी करत लोकांनी विक्रमी तिरंगा फडकवण्याचे काम केले होते. म्हणजेच, एका निर्णयाने लोकांवर अशा प्रकारे प्रभाव टाकला की दुकानांवर झेंड्यांची कमतरता होती, पण लोक तिरंगा खरेदी करत राहिले. आता पुन्हा एकदा असेच आवाहन करण्यात आले आहे. यावेळी किती तिरंगा फडकवतात, किती विक्रम होतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.