Har ghar Tiranga : पुन्हा प्रत्येक घरावर दिसणार तिरंगा! पंतप्रधान मोदींच्या ट्विटची सर्वत्र चर्चा...

  127

काय आहे हे ट्विट?


नवी दिल्ली : स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना (75 years of Independence) भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात 'हर घर तिरंगा' (Har ghar Tiranga) ही मोहिम सुरु केली होती. या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनादिवशी (Independence Day) प्रत्येक घराच्या खिडकीत एक तिरंगा फडकताना दिसत होता. भारतासाठी अभिमानास्पद असे ते चित्र होते. मात्र केवळ एकच वर्ष ही मोहिम न राबवता यंदाच्या वर्षीही 'हर घर तिरंगा' दिसावा असा पंतप्रधान मोदींचा मानस आहे. यंदाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनादिवशी पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दोन ट्विट्स केली आहेत. या ट्विट्समध्ये ते म्हणतात, तिरंगा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला पुढे राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. 'हर घर तिरंगा' मोहिमेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे. देशवासियांना यंदा ही मोहीम एका नव्या उंचीवर न्यायची आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशाच्या अभिमानाचे आणि अभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकावू या. तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी https://harghartiranga.com वर अपलोड करा, असे आवाहन पंतप्रधानांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी या मोहिमेमुळे सुमारे ५०० कोटींचे तिरंगे खरेदी करत लोकांनी विक्रमी तिरंगा फडकवण्याचे काम केले होते. म्हणजेच, एका निर्णयाने लोकांवर अशा प्रकारे प्रभाव टाकला की दुकानांवर झेंड्यांची कमतरता होती, पण लोक तिरंगा खरेदी करत राहिले. आता पुन्हा एकदा असेच आवाहन करण्यात आले आहे. यावेळी किती तिरंगा फडकवतात, किती विक्रम होतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या