मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि पालकमंत्रीपदावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलेच मान-अपमान नाट्य रंगले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्य दिनी (Independence Day) ध्वजारोहणानिमित्ताने कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार, कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात विशेषतः रायगड, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होत्या.
मात्र संभाव्य वाद आणि दावे टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तिसरा पर्याय निवडण्यात आल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे.
रायगडमध्येही मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास भरत गोगावले यांनी उघडपणे तीव्र विरोध केला आहे. या संघर्षावर शक्कल लढवत रायगडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आहे. तर तटकरे यांना पालघरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.
पुण्यात यावेळी अजितदादा की चंद्रकांतदादा नेमके कोणते दादा ध्वजारोहण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर पुण्यात ध्वजारोहण करण्याचा मान पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनाच देण्यात आला आहे. तर पुण्यासाठी उत्सुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर पालकमंत्री म्हणून स्पर्धेत असलेल्या हसन मुश्रीफ यांना सोलापूरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. तर जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हेही नाशिकचेच आहेत. मात्र या दोघांमधील संघर्ष टाळण्यासाठी दोघांनाही डावलत नाशिकमधील ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांना अमरावतीमध्ये तर दादा भुसे यांना धुळ्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जळगावमध्ये सध्या गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि अनिल पाटील असे तीन मंत्री आहेत. मात्र जळगावमध्ये गुलाबराव पाटीलच ध्वजारोहण करणार आहेत. अनिल पाटील यांच्याकडे बुलढाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर
जिल्हाधिकारी रायगड – रायगड
जिल्हाधिकारी हिंगोली – हिंगोली
जिल्हाधिकारी वर्धा – वर्धा
जिल्हाधिकारी गोंदिया – गोंदिया
जिल्हाधिकारी भंडारा – भंडारा
जिल्हाधिकारी अकोला – अकोला
जिल्हाधिकारी नांदेड – नांदेड
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…