Nitin Desai Suicide case : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी आरोपी कंपनीला हायकोर्टाचा दिलासा नाही

काय होती तक्रार?


मुंबई : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात (Nitin Desai Suicide case) एडेलवाईज कंपनीवर (Edelweiss company) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींनी हायकोर्टात (High Court) धाव घेतली होती. पण, आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची आज चौकशी होणार आहे, त्यासाठी ते कागदपत्रांसह खालापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.


खालापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा तसेच अटकेपासून दिलासा मिळावा याकरता आरोपींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने तुर्तास दिलासा देण्याचे नाकारले असून १८ ऑगस्टला यावर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे. राजकुमार बंसल यांच्यासह अन्य आरोपींनी ही याचिका केली होती.



तक्रारीत काय म्हटले होते?


नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स (ECL finanace) कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जाच्या परतफेडीसाठी आधी मदतीचे आश्वासन दिले मात्र नंतर सातत्याने पैशांची मागणी करत मानसिक त्रास दिला, त्यामुळेच कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी दाखल केली होती. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये देखील त्यांनी याच कंपनीवर मानसिक छळाचा आरोप केला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची