वसई-विरार मेट्रो रेल्वे प्रकल्पाला लवकरच मिळणार गती

  888

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे खा. राजेंद्र गावित यांना आश्वासन


वसई : मीरा-भाईंदरपर्यंत आलेली मुंबई मेट्रो पुढे वसई-विरारपर्यंत मंजूर करीत 'वसई-विरार मेट्रो कॉरिडॉर' ला अंतिम मंजुरी दिली जावी, यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित व वसई-विरार परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष मयूरेश वाघ यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी वसई-विरार मेट्रोबाबत चर्चा करण्यात आली.


याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षेत असलेल्या वसई- विरार मेट्रो प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याचा विश्वास खासदारांनी व्यक्त केला आहे.


केंद्र व राज्य सरकार मिळून लवकरात लवकर वसई-विरार मेट्रो कॉरिडॉर मंजूर करावा, अशी विनंती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना या बैठकीत करण्यात आली. वसई-विरार महानगर क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. पुढे ही लोकसंख्या सतत वाढत जाणार आहे. येथून लाखो लोक दररोज रेल्वेने मुंबईला कामानिमित्त प्रवास करतात.


यामुळे हायवे व लोकल ट्रेनवर ताण येतो व मर्यादा येतात. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे, असे या बैठकीत गावित व वाघ यांनी सांगितले. त्यावर याबाबत अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वसई-विरारपर्यंत मेट्रो आणावी, अशी मागणी सर्वप्रथम मयूरेश वाघ यांनी २०१८ मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. त्यावेळी विरारपर्यंत मेट्रो नेण्यासाठी मार्गाचे सर्व्हे व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना देण्यात आले व त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले होते. डीपीआर बनविण्याचे काम सुरू झाले खरे पण पूर्ण झाले नाही. पुढे हा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रत्यक्षात पूर्ण होऊ शकला नाही. आता या मेट्रो मार्गाबाबत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे घातले गेले आहे. त्यामुळे वसई-विरार मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होईल व शासनाला सादर होईल.


या प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढे वसई-विरार मेट्रोचे काम प्रत्यक्षात मार्गी लागू शकेल. वसई-विरारमध्ये मेट्रो मार्ग उभारून तो भाईंदर मेट्रो किंवा हायवेवरील एखाद्या मेट्रो स्टेशनला जोडून मुंबई-ठाण्याशी जोडला जाईल, असा विश्वास वाघ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर व्यक्त केला.


"शहरी विकास मंत्रालय मेट्रोचा प्रस्ताव जेव्हा देईल, तेव्हा या प्रस्तावाला नक्की मंजुरी दिली जाईल. राज्य सरकारला पूर्ण सहकार्य केले जाईल. वसई-विरार मेट्रोच्या कामात आम्ही नक्कीच सहकार्य करू", असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. त्यामुळे नजीकच्या काळात वसई-विरार मेट्रो प्रकल्प मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे खासदार राजेंद्र गावित व मेट्रोसाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांनी सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

Insurance Awareness Committee Update: ‘सबसे पहले लाईफ इन्शुरन्स’ मोहिमेद्वारे विमा जागरूकता समिती संरक्षण-प्रथम आर्थिक नियोजनाला चालना

मुंबई: भारताला जीवन विमा संरक्षणातील एका महत्त्वपूर्ण तफावतीचा सामना करावा लागत आहे जो २०१९ मध्ये ८३% वरून २०२३

लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन

माद्रिद: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात