World cup: विश्वचषकातील भारत-पाक लढत १४ ऑक्टोबरला

Share

९ सामन्यांच्या वेळापत्रकात आयसीसीने केला बदल

लंडन (वृत्तसंस्था) : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. क्रिकेटच्या मैदानात होणारा हा महासंग्राम १५ ऑक्टोबर ऐवजी आता १४ ऑक्टोबरला म्हणजेच एक दिवस आधी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकात आयसीसीने बदल केला असून सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. या सामन्यासह विश्वचषकातील एकूण ९ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

आयसीसीच्या सुधारित वेळापत्रकानुसार इंग्लंड विरुद्ध बांगलादेश हा सामना १० ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत १० ऑक्टोबरला रंगेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना १२ ऑक्टोबरला होईल. न्यूझीलंड-बांगलादेश हे संघ १३ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे महायुद्ध १४ ऑक्टोबरला होईल. इंग्लंड-अफगाणिस्तान सामना १५ ऑक्टोबरला होईल. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ ११ नोव्हेंबरला भिडतील. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मैदानी जंग ११ नोव्हेंबरला होईल. भारताचा नेदरलँडविरुद्धचा सामना १२ नोव्हेंबरला होईल.

पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. गतविजेते आणि उपविजेत्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये पाच ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही उद्घाटनीय सामना होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. भारताची सलामीची लढत ऑस्ट्रेलियाविरोधात ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याने यजमान भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करेल. यंदाचा विश्वचषक १० संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे.

भारताच्या दोन सामन्यांमध्ये बदल

भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १० संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत. स्थानिक स्थिती आणि काही संघांच्या विनंतीनंतर आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल केला. आयसीसीने नऊ सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. यामध्ये भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

25 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

49 minutes ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

1 hour ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

1 hour ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

1 hour ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

1 hour ago