Cluster Meetings of BJP : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान घेणार खासदारांची झाडाझडती

मिशन फत्ते करण्यासाठी भाजप कंबर कसून कामाला...


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजप पक्ष (BJP) तर यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजपाचे लक्ष महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa) अशा कमी प्रभाव असलेल्या राज्यांकडे लागले आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील एनडीए (NDA) खासदारांची थेट दिल्लीमध्ये (Delhi) बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका (Cluster meetings) घेत आहेत, त्यापैकीच ही एक बैठक असणार आहे.


आज महाराष्ट्र आणि गोव्यातील ४८ खासदारांची सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात एकत्रित बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinha) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा दिला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, तसेच अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत असेल.



आजच्या बैठकीत काय रणनिती?


भाजप प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करत आहे. पंतप्रधान घेत असलेल्या या क्लस्टर बैठकांपैकी आजच्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्यासाठी नेमकी काय रणनिती आखली जाणार, हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील सहभागी होणार आहेत.



सर्व ४३० खासदारांना भेटणार


नरेंद्र मोदी एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व ४३० खासदारांना भेटणार आहेत. नरेंद्र मोदी विविध गटातील सर्व खासदारांना भेटणार आहेत. ते पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या खासदारांनाही भेटणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील सहभागी होणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय