Bhalchandra Nemade speech : औरंग्याला मोठं करणार्‍यांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का?

नितेश राणे यांचा खडा सवाल


ठाकरे पिता-पुत्रांचाही घेतला समाचार


मुंबई : ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आणि कोसला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यामुळे हिंदू मने दुखावली गेली असून अशा लोकांना पुरस्कार द्यायचा का असा थेट सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता मुंबईतील टोलविषयी बोलणार्‍या व गुजराती आणि मारवाडी लोकांवर द्वेष दाखवणार्‍या ठाकरे पिता-पुत्रावरही हल्लाबोल चढवला आहे.


नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी औरंग्याला मोठं करण्याच्या आणि इतिहासामध्ये शिवरायांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याच्या षडयंत्राला खतपाणी घातले. औरंग्या हिंदूद्वेष्टा नव्हता, असं भालचंद्र नेमाडे एका कार्यक्रमात म्हणाले. ज्याने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू महिलांवर, समाजावर अत्याचार केला, धर्मांतरं घडवून आणली अशा औरंग्याला मोठं करण्याचं जे काम महाराष्ट्रात चाललं आहे, त्याला खतपाणी घालण्याचं काम भालचंद्र नेमाडेंसारख्या लोकांकडून होत आहे. अशा लोकांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का? आणि दिलेले पुरस्कार सरकारने परत घेतले पाहिजेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.



सगळे कॉन्ट्रॅक्ट हायवे कन्स्ट्रक्शनलाच का?


संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत असे किंवा सामनामध्ये असो, केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना महाराष्ट्र किती कळतो यावर आपले अकलेचे तारे चमकवलेले आहेत. तेव्हा जशी ब्रिटीशांची ईस्ट इंडिया कंपनी होती तशी या ठाकरेंची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का? कारण कोविडचा काळ असो किंवा महापालिकेच्या यांच्या सत्तेचा काळ असो, सगळे कॉन्ट्रॅक्ट फक्त हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात यायचे. पण मग वैभव चेम्बर्समध्ये बसून कोण कोण किती किती गुजराती आणि मारवाडी व्यापार्‍यांना भेटायचा याची माहिती आम्ही महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.



पुन्हा वसुली चालू करायचा हा धंदा


आज गुजराती आणि मारवाडी लोकांवर जो द्वेष दाखवला जातोय, मातोश्री २ हे कुठल्या गुजराती आणि मारवाडींच्या पैशांवर तयार झालंय याची थोडी माहिती द्यावी. कालपासून जो पेंग्विन तडफडतोय, काल त्याने पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील टोल बंद करावेत असं म्हटलं. मातोश्रीतील टोल बंद झाल्यामुळे आता या लोकांना मुंबईतील टोल आठवले आहेत. सगळं खर्चपाणी बंद झाल्याने अप्रत्यक्ष पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांना यानिमित्ताने भडकवायचं आणि परत हप्ते चालू करायचे, वसुली चालू करायची हा त्यांचा धंदा आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक

Navi Mumbai Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात रिक्षाचालकाची सव्वाकोटींची फसवणूक, तर मंदिरात पुजाऱ्याचाच चोरीचा प्रयत्न

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरात गुन्हेगारीच्या दोन वेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत ऑनलाइन गेमिंगच्या

BKC : सकाळची वाहतूक सुरळीत; पण सायंकाळी पुन्हा कोंडीचेच चित्र

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाहतूककोंडीवर उपाय

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून